Posts

Showing posts from June, 2025

ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

जालन्यात दुर्दैवी घटना: पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Image
  जांभूळ खाण्यासाठी गेले अन् परत आलेच नाही... वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालन्यात आज एक दुर्दैवी घटना समोर आलीय यात गावाजवळील नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.     जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव देवी गावात शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावाजवळ असलेल्या एका नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.     मृत्यू झालेल्या मुलांची नावे कुणाल राहुल खरात (वय १० वर्षे) आणि युवराज गौतम खरात (वय ९ वर्षे) अशी असून ते दोघे सख्खे चुलत भाऊ होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यांनी निघताना घरच्यांना जांभळं खाण्याचा बहाणा दिला होता. त्यानंतर त्यांनी गावाजवळ असलेल्या एका लहानशा तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांना पोहता न आल्याने ते पाण्यात बुडाले.     घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावक...

एसटी पास थेट शाळेत : १६ जूनपासून राज्यभरात विद्यार्थ्यांसाठी नवी सुविधा

Image
  एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजना.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या १६ जूनपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव योजना राबविणार आहे – ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’. या योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना एसटीचा पास मिळवण्यासाठी आगार कार्यालयात धावपळ करण्याची गरज भासणार नाही. एसटीचे पास थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्येच वितरित केले जाणार आहेत.    परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. या उपक्रमामुळे वेळ आणि श्रम वाचणार असून विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे अधिक भर राहील.    या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एसटी महामंडळाच्या सर्व आगार व्यवस्थापकांना आपल्या कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापक व प्राचार्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून पाससाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याम...

जालन्यात शेतकऱ्याच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी भव्य निदर्शने आंदोलन

Image
  जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जूनला भव्य निदर्शने आंदोलन वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या झालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे भव्य निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.     हा शेतकरी घनसावंगी तालुक्यातील असून काल जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या असताना घडली. या वेळी घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिल्ह्यातील २६ तलाठ्यांनी केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यावर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यासाठी तो शांततेत उभा होता. मात्र, पोलिसांनी त्या शेतकऱ्याला अर्वाच्य भाषेत धमकावत, जमिनीवर ढकलून दिले आणि त्याच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.     या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आ...

पुणे हादरलं! नदीवरील पूल कोसळला-६ जणांचा मृत्यू, २५ बेपत्ता

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मावळ तालुक्यातील कुडमळा येथे आज रविवारी एक भीषण आणि दुर्दैवी घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस, आणि आपत्ती व्यवस्थापन दल बचावकार्य करत असून, २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.     रविवार सुट्टी असल्याने अनेक पर्यटक नदीकाठी पर्यटनासाठी आले होते. नदीच्या काठावर आणि पुलावर पर्यटकांचा मोठा जमाव असताना अचानक पूल कोसळल्याने अनेकजण थेट पाण्यात पडले. जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली.     स्थानिक ग्रामस्थांनी आणि आपत्कालीन सेवांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. अद्यापही अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. मुख्य बाबी घटना रविवारी दुपारी सुमारे ३ ते ४ दरम्यान घडली पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती पूल कोसळताच अ...

केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटना: सात भाविकांचा मृत्यू; यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबाचा संपूर्ण जीवितांत अंत

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रविवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. आर्यन एव्हिएशन कंपनीचं हेलिकॉप्टर गौरीकुंड-सोनप्रयागजवळील दाट जंगलात कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील व्यावसायिक राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि अवघ्या २३ महिन्यांची मुलगी काशी यांचा समावेश आहे. या दुर्घटनेने एकाच कुटुंबाचा संपूर्ण उद्वंस झाला आहे. दुर्घटनेचा तपशील    आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरने केदारनाथहून गुप्तकाशीच्या दिशेने १५ जून रोजी पहाटे ५:१७ वाजता उड्डाण घेतले होते. मात्र उड्डाणानंतर काही मिनिटांतच, ५:२० च्या सुमारास हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. शोधमोहीमेदरम्यान, हेलिकॉप्टरचे अवशेष गौरीमाई खार्कच्या जंगली भागात सापडले. अपघातावेळी परिसरात दाट धुके, पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे हवामान अत्यंत खराब होते. त्यामुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज हवामानाशी संबंधित आहे. मृतांचा तपशील   या दुर्घटनेत पायलटसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाड...

पेरणीसाठी शेतात उतरले जिल्हाधिकारी: सोयाबीन पेरणी करत शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले

Image
प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी थेट शेतात उतरून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांच्या पाठीशी उभा राहतो, हे फार क्वचितच घडते. मात्र बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी हे शक्य करून दाखवत एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे.   खंडाळा (ता. बीड) येथील शेतकरी बाबासाहेब चिंतामण जायभाये यांच्या शेतात स्वतः जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी सोयाबीनच्या पेरणीसाठी तिफण हातात घेतली आणि चक्क चाडयावर मुठ धरत बी पेरले. या कृतीने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या मेहनतीला प्रशासनाची साथ असल्याची प्रचिती आली आहे.     पावसाळ्याची सुरुवात होताच शेतकरी पेरणीच्या कामात गुंतले असून, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः शेतात उतरले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर प्रशासनाकडून योग्य मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.     या उपक्रमात तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, मंडळ...

महिला पुरवठा निरीक्षण अधिकारी लाचेच्या जाळ्यात !

Image
  ४० हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण         लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) पथकाने एक धडाकेबाज सापळा राबवत गंगापूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती कांचन नामदेवराव कांबळे (वय ३४ वर्षे) यांना ४०,००० रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई वस्तू व सेवा कर भवनजवळ, रेल्वे स्टेशनच्या परिसरात करण्यात आली. तक्रारीची पार्श्वभूमी     ३२ वर्षीय तक्रारदाराच्या आजोबांच्या नावे असलेले रास्त भाव दुकान क्र. २९, मौजे काटेपिंपळगाव, ता. गंगापूर, याचे प्राधिकारपत्र निलंबित झाले होते. हे निलंबन मागे घेण्यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळे यांनी ७०,००० रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत, दिनांक १२ जून रोजी ला.प्र.वि. कार्यालयात तक्रार दाखल केली होती. पडताळणी आणि सापळा    दिनांक १३ जून रोजी, शासकीय पंचांच्या उपस्थितीत तक्रारदाराने आरोपी अधिकाऱ्याशी पुन्हा संपर्क साधला असता, तडजोडीअंती स्वतःसाठी १५,००० आणि जिल्हा पुरवठा अधिकारीसाठी २५,००० अश...

हृदयद्रावक दुर्घटना: पेरणीसाठी गेलेल्या दोन सख्या भावांसह विजेच्या तडाख्याने चार जणांचा मृत्यू

Image
तालुक्यावर शोककळा: एका ठिकाणी सख्या भावाचा तर दुसऱ्या घटनेत महिला व तरुणाचा मृत्यू.. वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण     आज शनिवारी एक अत्यंत हृदयद्रावक व दुर्दैवी दुर्घटना समोर आली असून पेरणीसाठी शेतात आई सोबत गेलेल्या दोन सख्या भावांसह विजेच्या तडाख्याने चार जणांचा मृत्यू झालाय.      मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी निसर्गाचा क्रूर आविष्कार बघायला मिळाला, जेव्हा अचानक आलेल्या वादळी वाऱ्याबरोबरच विजांच्या तडाख्यांमुळे तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्या भावांचा, एका महिलेचा आणि एका तरुणाचा समावेश असून, या घटना तालुक्यातील सारोळा गवळी, मोढा बुद्रुक आणि पिंपळदरी या शिवारात घडल्या. या अपघातांनी संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सारोळा गवळी: दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू    सारोळा गवळी येथील शिवारात दोन सख्खे भाऊ, यश राजू काकडे (वय १५) आणि रोहित राजू काकडे (वय २०) पेरणीसाठी शेतात गेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यानंतर ते आडोशासाठी झाडाखाली उभे होते. याच वेळी विजेचा जो...

जालन्यात लष्करी जवानाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Image
  गावात शोककळा; भारतीय लष्करात १३ वर्षे सेवा बजावलेला शूर सैनिक काळाच्या पडद्याआड वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गारटेकी गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, लष्करात कार्यरत असलेल्या लान्स नायक पवन शेषराव पवार (वय ३३) यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दिनांक १३ जून रोजी घडली. पवार सध्या सुट्टीवर गावी आले होते. झाडाची फांदी तोडत असताना त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.      लान्स नायक पवन पवार यांनी भारतीय लष्करात तब्बल १३ वर्षे कर्तव्य बजावले. सध्या ते आसाममधील ईएमई बटालियनमध्ये कार्यरत होते. लष्करात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांची शिस्त, देशभक्ती आणि निष्ठा यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये आणि गावातही आदरणीय होते.     शनिवारी (ता. १४ जून) दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर गारटेकी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला लष्कराचे अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रा...

जालना- अनुदान वाटपात घोटाळा : दहा तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई

Image
  वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण     जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानाच्या वाटपात मोठ्या घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी शासनाच्या अनुदान योजनांचा गैरवापर करत काही अपात्र खातेदारांना लाभ मिळवून दिला, तर काही खात्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने पैसे वर्ग करून शासन निधीचा गैरवापर केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.या चौकशी समितीच्या अहवालावरून आज शुक्रवार रोजी जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दहा तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली.    अंबड आणि घनसावंगी तालुक्यात शासनाच्या विविध निर्णयांनुसार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. मात्र या अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून, लाखो रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांचं नांव पुढे आलं आहे. अनेक गावांमध्ये दुबार नावे, अतिप्रदान रक्कम, आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे अनुदान वाटप केल्याचे निष्पन्न झाले आहे.       सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  या गंभी...

महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक २०२५ सदस्यसंख्या व प्रभाग रचना आदेश जारी

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने राज्यातील ३२ जिल्हा परिषदां आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य संख्या व प्रभाग रचना आदेश २०२५ जाहीर केला आहे. यासाठी “जिपनि‑२०२५/प्र.क्र.३६/पं.रा.-२” क्रमांकाचा शासन आदेश जारी करण्यात आला असून, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रभाग रचनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकृत सूचनादेखील दिल्या आहेत. कायदेशीर अधिष्ठान व न्यायालयीन निर्णय     महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ आणि महाराष्ट्र पंचायत समिती (प्रभाग रचना) नियम, १९६२ यांच्या अधीन राहून हा आदेश जारी करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी PIL क्र. १९७५६/२०२१ अंतर्गत राज्य निवडणूक आयोग व शासनास ४ महिन्यांच्या आत प्रभाग रचना व निवडणूक पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.    राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया तातडीने हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रभाग रचनेसाठी अधिकार व जबाबदाऱ्या     ...

वीज वितरण कंपनी चा भोंगळ कारभार:संतप्त कुटुंबाचे लेकरा बाळासह भर पावसात वीज कार्यालयासमोर धरणे

Image
एका भावाचे थकीत बील, दुसऱ्या भावाची लाईट कापली  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बोडखा या गावातील आज बुधवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भावाकडे थकीत वीजबिल असल्याने, वीज वितरण कंपनीने दुसऱ्या भावाचे वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कापले. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पीडित कुटुंब आपल्या पत्नी आणि मुलांसह भर पावसात थेट घनसावंगी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडकले.      पावसाची तमा न बाळगता त्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडून धरणे आंदोलन सुरू केले आहे. "आमच्यावर कसलाही थकबाकीचा दावा नाही, तरीही आमचे वीज कनेक्शन का कापले?" असा सवाल करत त्यांनी संबंधित ईंजिनीयरवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.      या प्रकरणामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चुकीच्या पद्धतीने, नातेवाईक असल्याचा आधार घेऊन वीज कनेक्शन कट करणे हे सर्रास अन्यायकारक आणि कायद्याच्या विरोधातील आहे, असे नागरिकांचे...

घनसावंगी अपघात:थेट पुलाच्या खाली गेली कार

Image
स्थानिकांकडून रस्त्याच्या सुरक्षेसाठी मागणी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली ते कुंभार पिंपळगाव रोडवरील बोडखा फाट्यावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने आलेली चारचाकी थेट रस्त्यालगत असलेल्या पुलाच्या खाली गेली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधितांनी सदरील घटनेची पोलीस व आरोग्य विभागाकडे नोंद केली नाही. अपघात स्थळी पुलाखाली गेलेली चारचाकी गाडी क्रेनद्वारे ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली      बोडखा फाटा हा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी तीव्र वळण असून, कठडे तुटलेले आहेत. यामुळे वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्यास थेट रस्त्याबाहेर जावं लागतं. विशेष म्हणजे, या कठड्यांवर अद्याप रेडियम फलक लावले गेलेले नाहीत. रात्री वाहन चालकांना मार्ग नीटसा दिसत नाही, आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.     स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या ठिकाणच्या सुरक्षेसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययो...

जालन्यात प्रशासकीय मान्यतेचे बनावट आदेश उघड:जिल्हा परिषद वर्तुळात उडाली खळबळ

Image
  बनावट स्वाक्षऱ्या करून विकास कामांसाठी तयार करण्यात आले बनावट आदेश; उच्चस्तरीय चौकशीची मागणी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रशासकीय मान्यतेचे बनावट आदेश उघडकीस आल्याने जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारीवर्गात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.     मिळालेल्या माहितीनुसार विशेष म्हणजे, या बनावट आदेशांवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची बनावट स्वाक्षरी करून, अज्ञात व्यक्तींनी हे आदेश तयार केले आहेत. या बनावट आदेशांच्या आधारे विकासकामे सरपंच अथवा कंत्राटदारांमार्फत सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. जालना तालुक्यात १० ते १२ गावांमध्ये बनावट आदेश प्रकरण     सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकट्या जालना तालुक्यातील १० ते १२ गावांमधील विकासकामांसा...

जालन्यात भ्रष्टाचाराचा लेखाजोखा उघडकीस? संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि गावांची यादी व्हायरल

Image
अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात हजारोचा घोटाळा ? वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात शासनाच्या विविध निर्णयांनुसार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. मात्र या अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झालेय, या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांचं नांव पुढे आलं आहे. अनेक गावांमध्ये दुबार नावे, अतिप्रदान रक्कम, आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे अनुदान वाटप केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत तशी यादी व रक्कम यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दिसून येत आहेत.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या यादीनुसार शासन निर्णयानुसार मिळालेले अनुदान (अंशतः) शासन निर्णय तालुका मंजूर अनुदान स्वीकृत अनुदान 17.11.2022 अंबड ₹112.63 कोटी ₹97.31 कोटी  घनसावंगी ₹70.27 कोटी ₹77.77 कोटी 20.06.2023 अंबड ₹11.27 कोटी ₹11.63 कोटी  घनसावंगी ₹11.77 कोटी ₹113.32 कोटी 31.01.2024 अंबड ₹28.62 लाख ₹25.03 लाख  घनसावंगी ₹95.72 कोटी ₹93.10 कोटी 29.02.2024 अंबड ₹11.09 कोटी ₹110.60 कोटी ...

वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच काळाचा घाला: जालन्यात १ वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या बकेटमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील एक अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रवक घटना घडलीय एक वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या बकेटमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय.       जालन्यातील सिरसवाडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, अंगणात खेळत असताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडून 1 वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत बालकाचे नाव शिव अनिल ढगे (वय 1 वर्ष) असे आहे. विशेष म्हणजे शिवचा वाढदिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला होता, मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला.    मिळालेल्या माहितीनुसार, अनिल ढगे यांचा मुलगा शिव आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. नेहमीप्रमाणे त्याची आई त्याला अंगणात सोडून घरकामात व्यस्त होती. घरातील इतर सदस्यही आपापल्या कामांत गुंतले होते. दरम्यान, अंगणात एक मोठी बादली पाण्याने भरून ठेवली होती. खेळता-खेळता शिव त्या बादलीजवळ गेला आणि बादलीला धरून उभा राहिला. पाण्याशी खेळत असतानाच अचानक तोल जाऊन तो बादलीत पडला. काही वेळातच श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.     जेव्हा घरच्यांनी त्याला पाहिलं, तेव्हा...

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!