घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे २ एप्रिल रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. संतोष भगवान खरात यांच्या पत्नीने आपल्या दोन चिमुकल्यांसह वारसाच्या गट नंबर १३० मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    विवाहिता सविता संतोष खरात (वय २५), मुलगा भावेश संतोष खरात (वय ५) आणि आबा संतोष खरात (वय ३) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, सविता खरात यांनी प्रथम आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत टाकले आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतली. अशी माहिती मिळतेय.

    ही दुर्दैवी घटना गावाशेजारील मुसा भद्रायानी नदीवरील तलावाजवळ घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली, तेव्हा ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच तिर्थपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि साजिद अहेमद, पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, तसेच पोलीस कर्मचारी शिंदे, माळी, पवार, जाधव आणि ग्रहरक्षक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

      या घटनेमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नसली तरी प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. विशेष म्हणजे मृत विवाहिता सविता खरात या संतोष खरात यांची दुसरी पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आत्महत्येमागे कोणते व्यक्तिगत किंवा कौटुंबिक कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

    रात्री उशिरा पर्यंत गावात लाईट नसल्यामुळे त्या विहिरीतील पाणी काढण्यासाठी जनरेटर ची व्यवस्था करून विहिरीबहेर पाणी काढण्यात येत होते यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ स्तब्ध झाले आहेत. या घटनेमागील नेमके कारण काय आहे, हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत विहीरीतील पाणी काढणे सुरू होते.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!