Posts

पालकांनो सावधान! खासगी शाळेच्या संचालकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

Image
  पालक संतप्त, शाळेबाहेर आक्रमक आंदोलन वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       एका नामांकित खासगी शाळेच्या संचालकाचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाच, संतप्त पालकांनी शाळेबाहेर आक्रमक आंदोलन छेडले. हा प्रकार कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात घडल्याची माहिती समोर आलीय.    मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेबाहेर मोठ्या प्रमाणावर पालक जमा झाले असून त्यांनी संचालकाच्या तात्काळ निलंबनाची आणि या कृत्याबाबत कठोर कायदेशीर कारवाईची जोरदार मागणी केली आहे.    या प्रकरणाची दखल घेत शिवसेना (ठाकरे गट) कल्याण विभागाच्या पदाधिकारी आशा रसाळ यांनी तात्काळ शाळेच्या ठिकाणी भेट देऊन पालकांशी संवाद साधला. त्यांनी पालकांच्या भावना जाणून घेत प्रशासनाकडे संबंधित संचालकावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.   दरम्यान, पालकांनी कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठून संचालकाविरोधात अधिकृत तक्रार दाखल केल...

घनसावंगी - नाल्यांच्या स्वच्छतेवरून संतापाचा स्फोट; ग्रामपंचायत कार्यालयाला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      गावात पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता न झाल्यामुळे ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून गावकऱ्यांनी १३ मे मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून जोरदार आंदोलन केले. ही घटना घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्री येथे घडलीय. "नाले साफ करा, गाव वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रीयतेविरोधात गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.      गावकऱ्यांनी सांगितले की, दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचतो. यामुळे गावातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे रहदारी अडथळ्यात येते आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. यंदा पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असताना देखील नाल्यांची साफसफाई करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे.     ग्रामस्थांनी यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही ग्रामसेवकांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला असून त्यांनी सकाळपासूनच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर १३ मे मंगळवार रोजी ठिय्या आंदोलन करत कार्यालयाला कुलूप लावले. ...

पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर: पाकिस्तानच्या 'स्वप्नातील हल्ल्याला' ठोस उत्तर! फोटोंसह

Image
  अदमपूर, पंजाब आजच्या विशेष दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसला दिली हजेरी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      ज्या आदमपूर एअरबेसवर पाकिस्तानने आपल्या सोशल मिडियावर 'स्वप्नात' हल्ला केल्याची खोटी बातमी मोठ्या जोमाने पसरवली होती, त्या ठिकाणी आज प्रत्यक्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १३ मे मंगळवार रोजी हजेरी लावून वस्तुस्थिती समोर आणली.     पंतप्रधान मोदींनी केवळ एअरबेसला भेट दिली नाही, तर भारतीय वायूदलाच्या जवानांमध्ये मिसळले, त्यांना सॅल्यूट केला आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गारही काढले. सैनिकांमध्ये जोश निर्माण करणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी अत्याधुनिक लढाऊ विमाने व संरक्षण उपकरणांची माहिती घेतली.      त्यांनी केवळ प्रत्यक्ष मैदानात जाऊन जवानांचे मनोबल वाढवले नाही, तर पाकिस्तानच्या दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया प्रोपगंडालाही प्रत्यक्ष कृतीने उत्तर दिलं.   पाकिस्तानच्या बनावट हल्ल्याच्या कल्पनेपेक्षा हजारपटीने वेगाने, मोदी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी तिथून रवाना झाले – शांत, ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण. ...

जालना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तरुणाचा दुर्दैवी प्रयत्न !

Image
  प्लॉटींगच्या वादातून पोलिसांवर खोट्या गुन्ह्याचा आरोप वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेवर गंभीर आरोप करत एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.      परमेश्वर कदम असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो जालना तालुक्यातील रेवगाव येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेवगावमध्ये प्लॉटच्या मालकीवरून परमेश्वर कदम यांचा गावातील एका व्यक्तीसोबत वाद सुरू आहे. या वादात समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरून पोलिसांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप परमेश्वर कदम याच्या नातवाइकांनी केला आहे.     पोलिसांनी विनाकारण गुन्हा दाखल करून मानसिक त्रास दिल्यामुळेच परमेश्वर कदम यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं नातवाइकांचे म्हणणे आहे. विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सम...

जालना - वीज अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Image
 "विजांचा कडकडाट, मेघगर्जना, आणि क्षणात घडलेला जीवघेणा अपघात..."  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना तालुक्यातील भाटेपुरी गावात आज (सोमवारी) दुपारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. वीज अंगावर पडल्याने विठ्ठल गंगाराम कावळे (वय २५) या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.      ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल आपल्या शेतात रोजच्या प्रमाणे कामात व्यग्र होते. दुपारनंतर अचानक आकाश काळं-कुट्ट झालं, वाऱ्याचा वेग वाढला आणि विजांचा गर्जना सुरू झाला. त्याच दरम्यान, एक प्रचंड वीज अंगावर पडली आणि क्षणात विठ्ठल जमिनीवर कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली आणि गंभीर अवस्थेत त्यांना तत्काळ जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.        तरुण वयातच विठ्ठल यांच्या अकाली जाण्याने भाटेपुरी गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबातील एकमेव आधारस्तंभ हरपल्याने आई-वडील, भावंडं व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकरीही अश्रू अनावर करून एकमेकांना धीर देतान...

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: दोनजण ठार तर पाच जखमी

Image
हैद्राबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      हैद्रा राबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या विना नंबर प्लेटच्या हायवाने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात परप्रांतीय दांपत्य जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, कारमधील मृतदेह व जखमींना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.   हैद्राबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. हैदराबाद येथील जी. रामू (वय ४४) आणि जी. माधुरी (वय ४०) हे दांपत्य या अपघातात जागीच ठार झाले. तर श्रीवाणी (वय ४०), अनुषा (वय १६), मेघना (वय १३), ऋषिका (वय ८) आणि नागेश्वर राव (वय ४४) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.     हैद्राबादहून  रविवारी दुपारी १२ व...

जालना जिल्ह्यात ड्रोन सदृश्य वस्तूंची हालचाल; नागरिकांना घाबरू नये-पोलीस विभागाचे आवाहन

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      आज ९ मे रोजी जालना जिल्ह्यात काही भागांमध्ये आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्याची नोंद झाली आहे. या संदर्भात नागरिकांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्पष्ट केले आहे की, या संदर्भात घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.   "या बाबतची माहिती संवेदनशील असल्याने यावर सविस्तर भाष्य करता येणार नाही. मात्र नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये," असेही त्यांनी सांगितले.     सदर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने संबंधित व्हिडिओ आणि घटनांची चौकशी सुरू केली आहे. कोणतीही अधिकृत माहिती येईपर्यंत अफवांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.     याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले, "सर्व माहितीची खातरजमा केली जात आहे. नागरिकांनी घाबरू नये आणि कोणत्याही असत्य माहितीवर विश्वास ठेवू नये."     जिल्हा ...

घनसावंगी तहसील कार्यालयात शेतरस्ते व पाणंद रस्त्यांच्या अतिक्रमणावर तडजोडीने निर्णय

Image
  तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - तहसीलदार योगिता खटावकर  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या परिपत्रकानुसार तहसील कार्यालय घनसावंगी येथे दिनांक ९ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत सस्ती अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीमध्ये शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढली जाणार आहेत. अशी माहिती घनसावंगी च्या तहसीलदार योगिता खटावकर यांनी दिली.      छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्याने सामान्य शेतकऱ्यांना तात्काळ व न्यायालयीन खर्च वाचवणारा न्याय मिळवून देण्यासाठी सस्ती अदालतींचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत तालुकास्तरावर खालील समिती कार्यरत असेल अध्यक्ष : तहसीलदार, सह-अध्यक्ष : गट विकास अधिकारी,सदस्य : उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपअभियंता (बांधकाम विभाग), वनपरिक्षेत्र अधिकारी (आवश्यकतेनुसार), पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, सचिव : नायब तहसीलदार (म...

अंबड तहसीलदारांची मोठी कारवाई- ३१ वाळू तस्करांवर गुन्हे दाखल, १ कोटींचा महसूल बुडवला

Image
  वाळकेश्वर व शहागड परिसरात महसूल विभागाची धाड: ट्रॅक्टरसह वाहने व मोबाईल जप्त वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     अंबड तालुक्यातील शहागड परिसरातील गोदावरी नदीपात्रातून अंदाजे २०० ब्रास वाळू चोरी गेल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने ३१ वाळू तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करत भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ व १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या वाळू चोऱ्येमुळे शासनाचा सुमारे १ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे उघड झाले आहे.    २९ एप्रिल रोजी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी शहागड व आपेगाव यांनी गावातील पंचांनामा घेऊन गोदावरी नदीपात्राची पाहणी करून पंचनामा केला. पाहणी दरम्यान जुन्या पुलाजवळ, महादेव मंदिराजवळ आणि समर्थ कारखान्याच्या पाणीपुरवठा ठिकाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उत्खनन केल्याचे निदर्शनास आले.     २४ एप्रिलपासून नदीपात्रात संचारबंदी लागू असूनही रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, लोडर व हायवा ट्रकच्या साहाय्याने वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळले....

जालना-पोहायला गेलेल्या दोन बालकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       नदीकाठी खेळात असताना पोहायला गेलेल्या दोन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यात घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.      जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा बुद्रुक परिसरात गुरुवारी दुपारी पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत बालकांची नावे उमेश दादाराव कासारे (वय १०) आणि प्रेम ज्ञानेश्वर घोरपडे (वय ८) अशी आहेत.    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमेश आणि प्रेम हे दुपारच्या सुमारास गावाजवळील पूर्णा नदीकाठी खेळत होते. खेळता खेळता ते दोघे नदीत पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. परिसरातील काही ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.    या दुर्दैवी घटनेने निमखेडा बुद्रुक गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या क...