अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री यांचा कार्यक्रम उधळला..!



वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांचा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील दि २३ सप्टेंबर सोमवार रोजीचा कार्यक्रम उधळून लावण्यात आलाय. दरम्यान या घटनेमुळे तीर्थपुरी परिसरासह तालुका भरामध्ये एकच खळबळ उडाली.

घनसावंगी तालक्यातील मौजे तीर्थपुरी तालुका घनसावंगी येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम करणे साठी २०.२७ कोटी रुपयाचे उपजील्हा रूग्णायाचा आज २३ सप्टेंबर सोमवार रोजी भूमीपूजन सोहळा माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते आयोजीत केला होता. यावेळी स्थानीक नगर पंचायती मधील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांना अधिकृत कसलीच माहिती देण्यात आली नाही फक्त उपनगराध्यक्ष यांना काल आमदार राजेश टोपे यांच्या पीए नी फोन करून उद्या कार्यक्रम आहे असे सांगितले. यामुळे तीर्थपुरी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष व काही नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी पसरल्याचे दिसून आलेय.

यासाठी त्या ठिकाणी मंडप, खुर्च्या, फलक ही लावण्यात आला होता परंतु आज सकाळच्या सुमारास नुसते नारळे फोडून भूमीपूजन व स्टंटबाजी नको अधिकृत भूमिपूजन करून लगेच काम सुरू करा असे म्हणत काही जणांनी मंडप वाल्यांना आपले साहित्य काढून घ्यायला सांगितले नसता आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. यावरून मंडप वाल्यांनी काहीना फोन करून या कार्यक्रमावरून वाद होण्याची शक्यता आहे असे सांगून टाकलेला मंडप सोडून घेत, लावलेला बोर्ड, खुर्च्या काढून घेतल्या.

याबाबत तीर्थपुरी नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष शैलेंद्र पवार यांच्याशी विचारणा केली असता आमचा विकास कामात विरोध नाही मात्र आम्ही नगरपंचायत चे पदाधिकारी असताना या कार्यक्रमाबाबत शासनाकडून व कुणाकडूनच आम्हाला व नगर सेवकांना अधिकृत पत्र व कसलीच माहिती देण्यात आली नाही. मला काल आमदार राजेश टोपे यांच्या पीए यांनी फोनवरून उद्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे असे सांगितले याबाबत कुठलीच लेखी माहिती किंवा निमंत्रण देण्यात आलेले नाही यामुळे आमचा विकास कामाला विरोध नाही परंतु तुम्ही नुसते नारळ फोडून गुपचूप नुसते भूमीपुजन करण्यापेक्षा अधिकृतपणे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करायला पाहिजे असे उपनगराध्यक्ष शैलेंद्र पवार यांनी सांगितले.







Comments

Popular posts from this blog

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या