अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

एसटी आरक्षणासाठी धनगर बांधवांचे जिल्हाभरात चक्का जाम

आरक्षण व दिपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी तात्काळ मान्य करावी, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्हाभरात धनगर बांधवांनी सोमवारी (१ ऑक्टोबर) मोठ्या संख्येने रस्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला. जालना येथे उपोषण करणारे प्रमुख आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात धनगर बांधवांची उपस्थिती होती. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती. 


 अंबड, घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, राजनी, विरेगाव यांसह तालुक्यातील विविध ठिकाणी आज सकाळीच धनगर समाजाच्या बांधवांनी संतप्त घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून वाहतूक ठप्प केली. तीर्थपुरी येथील अंबड–तीर्थपुरी मार्गावरील डाव्या कालव्याच्या पुलावर आंदोलन केले. यावेळी तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सपोनी वैशाली पवार यांना निवेदन सादर केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

    धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेशाची अंमलबजावणी करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकार फक्त आश्वासने देत आहे, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे, असा रोष आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. उपोषण करणारे दिपक बोऱ्हाडे गेल्या पंधरा दिवसांपासून अन्नत्याग करून बसले असून त्यांच्या प्रकृतीत सतत घसरण होत असल्याचा मुद्दा आंदोलनादरम्यान तीव्रतेने मांडण्यात आला.

    आमच्या तरुणांचे प्राण धोक्यात आहेत, तरीही शासन कानाडोळा का करत आहे? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. धनगर समाजाची एसटी प्रवर्गातील अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा हा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या