घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

एसटी आरक्षणासाठी धनगर बांधवांचे जिल्हाभरात चक्का जाम

आरक्षण व दिपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी तात्काळ मान्य करावी, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्हाभरात धनगर बांधवांनी सोमवारी (१ ऑक्टोबर) मोठ्या संख्येने रस्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला. जालना येथे उपोषण करणारे प्रमुख आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात धनगर बांधवांची उपस्थिती होती. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती. 


 अंबड, घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, राजनी, विरेगाव यांसह तालुक्यातील विविध ठिकाणी आज सकाळीच धनगर समाजाच्या बांधवांनी संतप्त घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून वाहतूक ठप्प केली. तीर्थपुरी येथील अंबड–तीर्थपुरी मार्गावरील डाव्या कालव्याच्या पुलावर आंदोलन केले. यावेळी तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सपोनी वैशाली पवार यांना निवेदन सादर केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

    धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेशाची अंमलबजावणी करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकार फक्त आश्वासने देत आहे, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे, असा रोष आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. उपोषण करणारे दिपक बोऱ्हाडे गेल्या पंधरा दिवसांपासून अन्नत्याग करून बसले असून त्यांच्या प्रकृतीत सतत घसरण होत असल्याचा मुद्दा आंदोलनादरम्यान तीव्रतेने मांडण्यात आला.

    आमच्या तरुणांचे प्राण धोक्यात आहेत, तरीही शासन कानाडोळा का करत आहे? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. धनगर समाजाची एसटी प्रवर्गातील अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा हा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या