अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांसाठी सभापती पदांसाठी आरक्षण सोडत दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी कळविल्यानुसार, शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण (महिला) या गटांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नामांकित महिलांसह) राखीव ठेवावयाच्या सभापती पदांची संख्या निश्चित केली असून ती पुढीलप्रमाणे आहे:

अनुसूचित जाती : १
अनुसूचित जाती (महिला) : १
अनुसूचित जमाती : १
अनुसूचित जमाती (महिला) : १
नागरिकांचा मागास प्रवर्ग : २
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : १
सर्वसाधारण : १
सर्वसाधारण (महिला) : १

    एकूण आठ पंचायत समित्यांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात येत असून, त्या दिवशी सर्वसामान्य नागरिक व इच्छुकांनी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे हजर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

   ही सोडत जिल्हाधिकारी जालना यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून उपजिल्हाधिकारी (सामान्य) नम्रता चाटे यांच्या स्वाक्षरीने याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या