घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल कलाम हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका फोर व्हिलरने उडवलं. अपघात झाल्याने ते रस्त्यावर कोसळले. त्याच क्षणी सुमारे पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. पोटावर आणि छातीवर एकामागोमाग एक वार करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी अवस्थेत कलाम यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन आणि आवेज खान अयुब खान या तिघांना अटक केली आहे. मात्र, या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून या हत्येचा सर्व अंगाने तपास सुरू आहे.
या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न समोर आला आहे – जर एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या रस्त्यात उघड्या डोळ्यांनी होऊ शकते, तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? शहरात सुरक्षेचं काय? या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
सध्या अमरावती पोलीस या हत्येच्या सर्व शक्य कोनांमधून चौकशी करत असून हल्लेखोरांच्या पार्श्वभूमीचा तपासही सुरू आहे. पोलीस विभागाच्या प्रतिष्ठेवर घाव घालणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अमरावतीकडे वळले आहे.
Comments
Post a Comment