घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

गोदाकाठच्या वाळू माफियांवर एसडीएम यांचा छापा:गोदावरी नदीपात्रात अवैध उत्खननाची उघड

 वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांची कारवाई; दोषींवर गुन्हे दाखल होणार-सातबाऱ्यावर बोजा ठेवण्याचीही तयारी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ व मुद्रेगाव येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करत उपविभागीय अधिकारी प्रभारी विजय चव्हाण यांनी सोमवारी (दि. २४ जून) दुपारी अचानक पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या आगमनाची भनक लागताच वाळू माफिया व त्यांचे ट्रॅक्टर केनिया चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला.

      प्रभारी उपविभागीय अधिकारी चव्हाण यांना काही ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंबड उपविभागीय कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी तत्काळ घनसावंगी प्रभारी तहसीलदार संतोष इथापे व त्यांच्या सहकाऱ्यांसह पथक तयार करून मौजे मंगरुळ व मुद्रेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्र व शेतांतून अवैधरीत्या काढण्यात आलेल्या वाळूची पाहणी केली.

     पाहणीदरम्यान शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू साठवलेली असल्याचे निदर्शनास आले. हे सर्व वाळू उत्खनन नदीपात्रातून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, संबंधित वाळू माफियांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत.

     विजय चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संबंधित वाळू माफियांविरोधात वाळू उपसा धोरण कायदा २०२५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय, ज्यांच्या शेतात अवैध वाळू साठवणूक आढळून आली, त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

   घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

    या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या पुढील टप्प्यातील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या