अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

गोदाकाठच्या वाळू माफियांवर एसडीएम यांचा छापा:गोदावरी नदीपात्रात अवैध उत्खननाची उघड

 वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांची कारवाई; दोषींवर गुन्हे दाखल होणार-सातबाऱ्यावर बोजा ठेवण्याचीही तयारी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ व मुद्रेगाव येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करत उपविभागीय अधिकारी प्रभारी विजय चव्हाण यांनी सोमवारी (दि. २४ जून) दुपारी अचानक पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या आगमनाची भनक लागताच वाळू माफिया व त्यांचे ट्रॅक्टर केनिया चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला.

      प्रभारी उपविभागीय अधिकारी चव्हाण यांना काही ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंबड उपविभागीय कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी तत्काळ घनसावंगी प्रभारी तहसीलदार संतोष इथापे व त्यांच्या सहकाऱ्यांसह पथक तयार करून मौजे मंगरुळ व मुद्रेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्र व शेतांतून अवैधरीत्या काढण्यात आलेल्या वाळूची पाहणी केली.

     पाहणीदरम्यान शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू साठवलेली असल्याचे निदर्शनास आले. हे सर्व वाळू उत्खनन नदीपात्रातून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, संबंधित वाळू माफियांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत.

     विजय चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संबंधित वाळू माफियांविरोधात वाळू उपसा धोरण कायदा २०२५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय, ज्यांच्या शेतात अवैध वाळू साठवणूक आढळून आली, त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

   घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

    या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या पुढील टप्प्यातील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या