घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

कारचा भीषण अपघात अंबडचा तरुण ठार

 भीषण अपघात:२१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    कारचा व कंटेनर चा भीषण अपघात झाला असून कार कंटेनरला धडकून अंबड येथील तरुणाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला. यात कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.


     छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर करमाड परिसरातील सटाणा शिवारात सोमवारी (२३ जून) तीनच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव वेगाने आलेली कार जोरात धडकली. या अपघातात कारमधील एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.

     अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आदित्य शिवाजी धुपे (वय २१, रा. डावरगाव, ता. अंबड, जि. जालना) असे असून, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नवनाथ धनंजय भिडे (वय ३५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) असे आहे. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (क्र. एमएच ४३ वाय ६०६५) जालन्याकडून येत होता आणि डीएमआयसीकडे जाणाऱ्या करमाड-सटाणा शिवारातील उड्डाणपुलाजवळ वळत होता. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगात आलेल्या कारने (क्र. एमएच २३ वाय २२८१) कंटेनरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरमध्ये अडकून तिचा चक्क चूर झाला.

    घटनास्थळी करमाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. मृतदेह आणि जखमीला तत्काळ घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
      
     पोलीस घटनेचा तपास करत असून अपघाताचे कारण वाहनाचा अतिवेग असल्याचे प्राथमिक अंदाजातून स्पष्ट होत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या