अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलैदरम्यान मुंबईत

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा ३० जूनपासून सुरू होणार असून, १८ जुलैपर्यंत ते चालणार आहे. अधिवेशनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील विविध वरिष्ठ मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.

     या बैठकीस विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

     या अधिवेशनात राज्यातील महत्त्वाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा, तसेच विविध विधेयकांच्या मंजुरीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, तर सरकारकडून आपल्या कामकाजाचा आढावा मांडला जाईल.

 या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन नेहमीप्रमाणेच राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, जनतेचे लक्ष या अधिवेशनात होणाऱ्या घडामोडांकडे लागले आहे.


Comments

Popular posts from this blog