अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

छत्रपती संभाजीनगर हादरले! महिला कीर्तनकार यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात स्थित सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात राहणाऱ्या लोकप्रिय महिला कीर्तनकार संगीताताई अण्णासाहेब पवार (वय अंदाजे ४५) यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. आश्रमाजवळील एका शेडमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समजताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, तपासासाठी फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

   संगीताताईंना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या धमक्यांबाबत त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीताताईंना आतापर्यंत तीन वेळा अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र, याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.

    मिळालेल्या माहितीनुसार, संगीताताई पवार या धार्मिक आणि कीर्तन सेवा क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांच्या किर्तनात समाजप्रबोधनाची दिशा असायची. त्यामुळे समाजातील काही अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रवृत्तींवर त्यांनी वेळोवेळी टीका केली होती, त्यामुळे त्यांना विरोध होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरु आहे.

   पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व शक्य त्या दिशांनी तपास सुरु आहे. हत्येचे नेमके कारण, आणि मारेकऱ्यांमागील सूत्रे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

    या घटनेनंतर वैजापूरसह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलीसांनी तत्काळ आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून केली जात आहे. संगीताताई पवार यांच्या हत्येमुळे धार्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता या प्रकरणाच्या तपासाकडे लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या