घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

शेतातील डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

अवघ्या सात व पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू:गावावर शोककळा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात खेळताना दोन निरागस बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मोढा बु. गावात घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले आहेत.

      मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या बालकांची नावे हर्षदा गणेश कांबळे (वय ७) आणि रुद्र गणेश कांबळे (वय ५) अशी असून, हे दोघेही ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील होते. रविवार दुपारी घराजवळील शेतशिवारात ते खेळत असताना एका मोठ्या डबक्यात ते बुडाले. काही वेळातच त्यांचा शोध घेणाऱ्या नातेवाइकांना ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    या दुःखद घटनेने कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी कुटुंबीयांना धीर दिला.

     दरम्यान, मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतांमध्ये आणि आजूबाजूच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी लहान मुले सहज खेळायला जातात आणि दुर्घटना घडण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर प्रशासन व पालकांनी विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

   ही घटना एक गंभीर इशारा असून, अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनीच काळजी व दक्षता घेणे गरजेचे आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या