अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या बालकांची नावे हर्षदा गणेश कांबळे (वय ७) आणि रुद्र गणेश कांबळे (वय ५) अशी असून, हे दोघेही ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील होते. रविवार दुपारी घराजवळील शेतशिवारात ते खेळत असताना एका मोठ्या डबक्यात ते बुडाले. काही वेळातच त्यांचा शोध घेणाऱ्या नातेवाइकांना ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुःखद घटनेने कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी कुटुंबीयांना धीर दिला.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतांमध्ये आणि आजूबाजूच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी लहान मुले सहज खेळायला जातात आणि दुर्घटना घडण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर प्रशासन व पालकांनी विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
ही घटना एक गंभीर इशारा असून, अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनीच काळजी व दक्षता घेणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment