घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

शेतातील डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

अवघ्या सात व पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू:गावावर शोककळा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात खेळताना दोन निरागस बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मोढा बु. गावात घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले आहेत.

      मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या बालकांची नावे हर्षदा गणेश कांबळे (वय ७) आणि रुद्र गणेश कांबळे (वय ५) अशी असून, हे दोघेही ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील होते. रविवार दुपारी घराजवळील शेतशिवारात ते खेळत असताना एका मोठ्या डबक्यात ते बुडाले. काही वेळातच त्यांचा शोध घेणाऱ्या नातेवाइकांना ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    या दुःखद घटनेने कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी कुटुंबीयांना धीर दिला.

     दरम्यान, मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतांमध्ये आणि आजूबाजूच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी लहान मुले सहज खेळायला जातात आणि दुर्घटना घडण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर प्रशासन व पालकांनी विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

   ही घटना एक गंभीर इशारा असून, अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनीच काळजी व दक्षता घेणे गरजेचे आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या