अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यात पुन्हा घोटाळा:शासनाला तब्बल १ कोटींचा लावला चुना

 बनावट दस्तावेजांच्या आधारे शेतकरी अनुदान व पीकविमा योजनांचा गैरवापर


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      जालन्यात शासकीय अनुदान घोटाळा महाराष्ट्रात गाजत असताना आता पुन्हा एक घोटाळा उघडकीस आला असून यात शासनाला तब्बल १ कोटींचा चुना लावण्यात आला आहे.

       भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड गावात बनावट सातबारा आणि खोटे पीक पेरा दाखवत शासनाच्या अनुदान व पीकविमा योजनांमध्ये तब्बल १ कोटी २ लाख ३९ हजार रुपयांचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कृषी व पणन विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.

      या प्रकरणात आरोपींनी खोटे सातबारा तयार करून त्यावर २०९३ क्विंटल जास्तीची सोयाबीन पीक पेरा नोंदवली, त्याआधारे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान व पीकविमा मिळवला आणि त्याचाच वापर करून बनावट उत्पादन विक्रीचे दस्तावेज सादर केले. या बनावट नोंदींच्या आधारे सोयाबीनची विक्री दाखवून राज्य शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

    या प्रकरणी जालना जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी पारध पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्या आधारे पुढील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

1. भागवत सुदाम दौड
2. सुनिल शिवाजी शिंदे
3. अनिल शिवाजी घुले
4. सुरेश कैलास सोनवणे
5. रमेश ठकुबा गायकवाड
6. कृष्णा साईनाथ गायकवाड
7. गोपीनाथ कौतीक दौड
8. सचिन भगवान दौड
9. कृष्णा सुभाष आन्वेकर (सर्व रा. जानेफळ गायकवाड, ता. भोकरदन, जि. जालना)
10. पवन वाघ (पूर्ण नाव अज्ञात), रा. वरुड बु., ता. भोकरदन, जि. जालना

    सदर प्रकरणाचा तपास सपोनि एस.डी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित संस्थेचे आर्थिक व्यवहार, शासनाच्या अनुदानाची रक्कम आणि शेतमाल विक्रीच्या दाखल्यांची चौकशी अधिक खोलवर सुरू आहे.

    या प्रकारामुळे शासन यंत्रणा सतर्क झाली असून, इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या बनावट नोंदींचा तपास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या