घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

बीड जिल्ह्यात काळीमा फासणारी घटना: कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार !

 उमाकिरण व ओम क्लासेसचे विजय पवार आणि प्रशांत खटोकर यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राची विश्वासार्हता डागळवणारी आणि समाजाला हादरवून सोडणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उमाकिरण आणि ओम कोचिंग क्लासेसचे शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खटोकर या दोघांवर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्यावर POCSO (Protection of Children from Sexual Offences) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     मुलींच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कठोर कायद्याखाली या दोघांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे बीडमधील पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड संताप व अस्वस्थता पसरली आहे. "शिक्षक" ही पदवी श्रद्धेची असते, पण काही विकृत प्रवृत्तीचे लोक या पदाचा गैरवापर करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची बदनामी करत आहेत, हे दुर्दैव आहे.

    या घटनेचा समाजातील विविध स्तरातून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. अनेकांनी यासाठी सोशल मिडियावर तसेच प्रत्यक्षातही निषेध आंदोलन सुरू केले आहे. उमाकिरण शिकवणीमधील घडलेली ही घटना ही केवळ एका विद्यार्थिनीवर अन्याय नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर आघात करणारी आहे.

     पोलिस प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू असून, संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथके स्थापन करण्यात आले आहेत. या प्रकरणामागे आणखी कोणी आका किंवा समर्थन करणारी मंडळी आहेत का, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण फक्त गुन्हेगारालाच शिक्षा देऊन चालणार नाही, तर अशा घृणास्पद प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांनाही उघड करून कठोर कारवाई केली पाहिजे.

     मुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने एकजूट होऊन अशा प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवणे हे काळाची गरज बनली आहे. समाज, पोलीस आणि न्यायव्यवस्थेने एकत्र येऊन या प्रकरणात कठोर पावले उचलावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

   "गुन्हेगाराला शिक्षा हवीच, पण त्यामागच्या आका-सम्राटांनाही बेपर्दा करणे आवश्यक आहे. भविष्यात अशा नालायक लोकांना कोणीही पाठीशी घातले नाही पाहिजे अशा संत्रप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या