अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना - ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात माय-लेक ठार

 ट्रकने दुचाकीला उडवले वडील व लहान मुलगी जखमी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वरील जामखेड फाटा येथे आज शुक्रवारी सायंकाळी एका भीषण अपघातात माय-लेक यांचा चा मृत्यू झाला असून वडील व लहान मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना बीड येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या मोटरसायकलला भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने घडली.

     मोटरसायकल क्रमांक महा २१ BW १८५० वर विश्वकांत शिंदे (वय ३५) हे पत्नी शीला (वय ३१), मुलगी परी (वय ४), व लहान मुलगी (वय १) यांच्यासोबत प्रवास करत होते. दरम्यान, ट्रक क्रमांक के ऐ ५६ ४२०१ चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून मोटरसायकलला जोराची धडक दिली.

    धडकेनंतर शीला शिंदे व त्यांची मुलगी परी शिंदे ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. परीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शीला शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात मोटरसायकलस्वार विश्वकांत शिंदे व त्यांची लहान मुलगी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.

     घटनास्थळी अंबड पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी तात्काळ मदतकार्य राबवत जखमी व मृतांना रुग्ण वाहिकेने घाटी रुग्णालयात रवाना केले व अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघातग्रस्त कुटुंबातील दोन निष्पाप जीवांचा मृत्यू झाल्यामुळे शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या