Posts

Showing posts from December, 2024

घनसावंगी तालुक्यात अत्याचाराच्या दोन घटना !

Image
  घनसावंगी तालुक्यात अत्याचाराच्या  दोन घटना ! जिवे ठार मारण्याची धमकी देत  केला लैंगिक अत्याचार   एक दुर्दैवी व काळीमा फासणारी घटना समोर येत आहे घनसावंगी तालुक्यात एका मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देत एका ३० वर्षीय तरुणाने मुलींवर लैंगिक अत्याचार केलाय याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याआधी ही घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथेही आत्याचाराची घटना घडली होती.   मागील पाच महिन्यांपासून घनसावंगी तालुक्यातील विठ्ठलनगर शिवारात संशयित आरोपी अनिल नामदेव शिंदे याने शाळेत जात असताना एका मुलीला वारंवार अडवून तिला जबरदस्तीने अत्याचारासाठी दबाव आणत होता.      आरोपीने काही दिवसापूर्वी सदरील मुलीला मोबाईल व पैसे देऊन तिला उसाच्या शेतात नेले व तिच्यासोबत जबरदस्तीने आत्याचार केला. त्यानंतर तिला धमकी दिली की, जर तू कोणाला काही सांगितले, तर तुला जिवे ठार मारले जाईल असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.   याप्रकरणी पोलीस ठाणे तिर्थपुरी येथे आरोपी विरुद्ध 64(2) (M), 351 (2) बी एन एस सह कलम 4, 6 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, 2012 नुसार गुन्...

तीर्थपुरीत तरुणाचा मृत्यू ; नातेवाईकातून घातपाताचा संशय

Image
  तीर्थपुरीत तरुणाचा मृत्यू ; नातेवाईकातून घातपाताचा संशय वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे आज ३१ डिसेंबर मंगळवारी एक दुःखद घटना समोर आली आहे. मूळ गाव पीरगैबवाडी येथील राजू छबू कोळेकर (वय २८ वर्षे) यांचा मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी तीर्थपुरी ते अंबड रोडवर दुपारच्या सुमारास मृतदेह आढळला.    त्यांनतर तीर्थपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, पोहेको नारायण माळी यांनी तत्काळ राजूस प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी येथे हलवले असता वैदकिय अधिकारी डॉ एस डी घुले यांनी तपासून राजूस मयत घोषीत केले.    राजुच्या बहिणी यांनी सांगितले की राजू ची पत्नी तीन महिन्यांपासून तीर्थपुरी येथील एका धाब्यावर भांडे घासण्याचे काम करत होती. तीन दिवसापूर्वी राजू पुण्याहून तीर्थपुरी ला आला होता घटनेच्या दिवशीच राजू ने दुपारी १:३० वाजता त्यांचे रुई येथील मेहुने परमेश्वर लक्ष्मण गव्हाणे यांना मोबाईलवर फोन करून तीर्थपुरी येथे बोलावले होते. ते आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.    दरम्यान राजुच्या बहिणी सिला परमे...

उपविभागीय अधिकारी यांची होडीत जाऊन वाळू तस्करीवर कारवाई

Image
  उपविभागीय अधिकारी यांची होडीत जाऊन वाळू तस्करीवर कारवाई  अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह यांनी आज दि ३० डिसेंबर रोजी दोन हायवा, दोन ट्रॅक्टर, वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी केनी आणि अन्य साहित्य जप्त केले. विशेष म्हणजे, गोंदी येथे त्यांनी होडीत बसून कारवाई केली, ज्यामुळे या कारवाईने मोठा धक्का दिला आहे.   आज सकाळी जामखेड फाटा येथे पुलकीत सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला. सकाळी पाच वाजता हा हायवा तब्बल तीन किलोमीटर पाटलाग करून पकडण्यात आला आणि त्यानंतर तहसील कार्यालयात लावण्यात आला. पथकात मंडळ अधिकारी विजय जोगदंड, विठ्ठल गाडेकर, श्रीनिवास जाधव, चंद्रकांत खिल्लारे, ईश्वर पावसे आणि श्रीमती सुकन्या गवते सहभागी होते.   त्यानंतर उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह यांनी अंबड तालुक्यातील गोंदी येथे होडीत बसून अधिकाऱ्यांनी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू वाहतुकीवर कडक पावले उचलली गेली असून, वाळू तस्करांवर मोठा धक्का बसला आहे.

शेतकऱ्यांना कधी मिळणार पीक विमा व अतिवृष्टी अनुदान ? जिल्हा कृषी अधीक्षक यांनी दिली माहिती

Image
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार पीक विमा व अतिवृष्टी अनुदान वर्ष सरत आले तरीही शेतकऱ्यांना अग्रीम विमाही नाही व अनुदानही नाही.. ऑक्टोबर महिन्यात झाल्या होत्या बैठका ओमप्रकाश उढाण    वर्ष संपत आले तरीही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पीक विमा आणि अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम विमा रक्कम जमा होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, डिसेंबर महिना संपत असताना अद्याप या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.   जालना जिल्ह्यातील शेतकरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे गेले. शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारकडून या नुकसानीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. मात्र, अद्याप याद्या तयार करण्याचे आणि ऑनलाईन प्रक्रियांचे काम प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना अनुदानाच्या प्रतीक्षेत राहावे लागले आहे. जालना जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर दरम्यानचे सरासरी प...

माझ्या अंगात देव येतो असे म्हणत महिलेवर अत्याचार

Image
  माझ्या अंगात देव येतो असे  म्हणत महिलेवर अत्याचार महिलांनी भोळा भाव देवा मला पाव ही भूमिका सोडावी  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र भरत दररोज विविध घटना, घडामोडी घडताहेत यात विशेष करून महिला, मुली, अल्प वयीन मुली यांच्यावर अत्याचारांच्या घटनाही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. पुण्यात एक अत्यंत धक्कादायक व खेद जनक घटना घडलीय. माझ्या अंगात देव येतो असे म्हणत एका महाशयाने चाकूच्या धाकावर महिलेवर आत्याचार केलय. या महिलेने या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे. म्हणून कही महिलांनी आपली श्रद्धा ठेवावी परंतु अंधश्रद्धा न ठेवता भोळा भाव देवा मला पाव ही भूमिका सोडावी व अशा भोंदू पासून सावध होण्याची गरज आहे.     याआधी सुद्धा महाराष्ट्रात महिलांविरोधात असे गुन्हे घडले आहेत. कठोर कायदे बनवूनही गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी शासन व प्रशासन यांच्या कडून अनेक कठोर पावलं उचलण्यात येऊन कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र तरीही घडणाऱ्या गुन्ह्यांच प्रमाण कमी झालेलं दिसून येत ...

जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाकडून अत्याचार

Image
  जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाकडून अत्याचार  पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या   एका अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाकडून अत्याचार करून तो पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या पोलिसांनी आज रविवारी मुसक्या आवळल्यात.    जालना येथील रेल्वेस्टेशन परिसरातील सोनलनगर येथे एका इमारत बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी परतूर तालुक्यातील एक व्यक्ती वॉचमन म्हणून काम करीत असून, त्याठिकाणी तो व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत आहे. या इमारतीमध्ये उत्तर प्रदेशातील कामगारांकडून फरशी बसविण्याचे काम सुरू आहे.   चार-पाच दिवसांपूर्वी वॉचमनची १४ वर्षीय मुलगी इमारतीच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळू घालण्यासाठी गेली असतांना फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या फैजान खान (रा. उत्तर प्रदेश) याने तिचा हात धरून बळजबरीने खालच्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये तिच्यावर अत्याचार केला होता. मात्र, बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या कुटुंबाने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती.    आज रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आज सदर मुलगी पुन्हा...

घनसावंगी - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारः नागरिकांमध्ये संतापाची लाट

Image
  घनसावंगी - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारः नागरिकांमध्ये संतापाची लाट   जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना घडलीय या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.   कुंभार पिंपळगांव येथील एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून एका संचालकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला असल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी २५ डिसेंबर रोजी घनसावंगी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आसाराम राऊत असं संशयित आरोपीच नाव असून, याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय    याप्रकरणी आरोपीला न्यायाल्यात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी सूनाऊन सद्य स्थितीत आरोपी जालना येथे न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास अंबड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक ए. के. ढाकणे करत आहेत. नागरिकांची मागणीः सीसीटीव्ही ...

अबब आश्चर्यम २७ वर्षीय शिक्षिकेने विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला लैंगिक अत्याचार

Image
  अबब आश्चर्यम २७ वर्षीय शिक्षिकेने विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला लैंगिक अत्याचार   शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार किंवा विनयभंगाचे प्रकार घडतानाच्या घटना आपणास ऐकायास मिळतात. परंतु पुण्यातील खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इंग्लिश मीडियम शाळेतील २७ वर्षीय शिक्षिकेने दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.    याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी या शिक्षिकेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या आरोपी शिक्षिकेस अटक करण्यात आलीय अशी माहिती मिळाली.     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील आरोपी महिला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. काही महिन्यांपूर्वी तिने दहावीतील १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने विद्यार्थ्यासोबत शाळेतच लैंगिक संबंध प्रस्थापित केले. मुलाने झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर शिक्षिकेस अटक करण्यात आली.

झोपेतच भाविकांवर काळाचा घाला: ट्रक आणि बसचा भीषण अपघात, दोनजण ठार, ३० जखमी

Image
  झोपेतच भाविकांवर काळाचा घाला: ट्रक आणि बसचा भीषण अपघात, दोनजण ठार, ३० जखमी    पंढरपूरजवळ रविवारी पहाटे भटुंबरे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत. हा अपघात भाविकांची बस आणि ट्रक समोरासमोर धडकल्याने झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे समोरील भाग अक्षरशः चिरडले गेले.   अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्वरीत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात बसमधील बेबाबाई महाळसकर (वय ५५) आणि जनाबाई महाळसकर (वय ७) यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळाली.   या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, यापैकी १२ जण गंभीर आहेत. त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, अपघात कशामुळे झाला याबाबत चौकशी सुरू आहे.

ग्रामीण भागातील पाच विद्यार्थ्यांचा सीए परीक्षेत झेंडा

Image
  ग्रामीण भागातील पाच  विद्यार्थ्यांचा सीए परीक्षेत झेंडा तीर्थपुरीतील पाच विद्यार्थी सीए परीक्षेत यशस्वी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     ग्रामीण भागातील पाच जणांचा प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत झेंडा फडकवला आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील पाच विद्यार्थ्यांनी सीए परीक्षेत यश संपादन केले आहे. याबाबत नुकताच निकाल हाती आला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे आयोजित नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम परीक्षेत तीर्थपुरीतील पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: 1. अनुजा अशोक तोष्णीवाल - अनुजा यांनी प्रगत आर्थिक व्यवस्थापन आणि लेखापरीक्षण या विषयांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. 2. प्रतीक्षा संजय तापड़िया - प्रतीक्षाने योग्य गुणांसह परीक्षेत यश मिळवले आहे. 3. तेजस किशोर मानधानी - तेजस यांनीही परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज...

जालन्यात साखर कारखान्यात स्फोट, दोन जण ठार

Image
  जालन्यात साखर कारखान्यात  स्फोट, दोन जण ठार जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वरफळ येथे आज एक दुर्दैवी घटना घडली. बागेश्वरी साखर कारखान्याच्या चुनाभट्टी विभागातील सल्फर टाकीचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यात दोघेही कामगार जागीच ठार झाले. घटनास्थळी तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिक प्रशासनाने घटनेची त्वरित दखल घेतली असून, तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी रुग्णालयात धावले आणि पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. कारखाना व्यवस्थापनाकडून या अपघाताचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक लोकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

दोन अल्पवयीन बहिणींची अत्याचार करून हत्या; आरोपीच्या एन्काऊंटरची मागणी

Image
  दोन अल्पवयीन बहिणींची अत्याचार करून हत्या; आरोपीच्या एन्काऊंटरची मागणी   पुण्यातील कल्याण येथे अल्पवयीन मुलीचे अत्याचारातून हत्येचे प्रकरण घडल्यानंतर राजगुरुनगर येथेही असाच काहीसा प्रकार घडला. राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन बहिणींच्या अत्याचारानंतर झालेल्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. संशयीत आरोपी अजय दास (वय ५४), याने या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपीला परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करताना अटक केली आहे.    या घटनेनंतर पुण्यातील भटक्या विमुक्त समाजाने तीव्र निदर्शने केली असून, समाजातील गोसावी समाजाने आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आंदोलकांनी आरोपीचा "हैदराबाद पॅटर्न" प्रमाणे एन्काऊंटर करून भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे.   भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांनी आरोप केला आहे की, सरकारने त्यांना दुर्लक्षित केले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत त्यांना संरक्षण दिले जावे आणि या घटनेतील मृत मुलींच्या पालकांना प्रत्येकी २५ लाख रुप...

मराठवाड्यात २७-२८ डिसेंबरला वादळी वारे, गारपीट व पाऊस; शेतकऱ्यात वाढली धाकधूक !

Image
  मराठवाड्यात २७-२८ डिसेंबरला वादळी वारे, गारपीट व पाऊस; शेतकऱ्यात वाढली धाकधूक ! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    हवामान खात्याने २७ व २८ डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या येलो अलर्टमुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या पावसाने आणि गारपिटीने त्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती वाटत आहे. म्हणून २७-२८ डिसेंबरला कही ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज वर्वावला आहे यामुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकरी चींताग्रस्थ होऊन शेतकऱ्यात धाकधूक वाढली आहे.   प्रमुख हवामान बदलांचा अंदाज व्यक्त करत, हवामान खात्याने म्हटले आहे की, २७ डिसेंबरपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरूवात होईल, आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. यात जालना, संभाजी नगर, हिंगोली, बीड, वाशीम, अकोला, बुलढाणा, अंबाजोगाई इत्यादी जिल्हे असतील. यानंतर २८ डिसेंबर रोजी गारपिटी आणि पावसाचा प्रभाव विदर्भ व मराठवाड्यात जास्त दिसेल अशी शक्यता वर्तवलीय. दरम्यान मागील वर्षी ...

आमदार हिकमत उढाण यांचा बैलगाडीतून प्रवास; शेतकऱ्यांशी जोडलेली नाळ

Image
आमदार हिकमत उढाण यांचा  बैलगाडीतून प्रवास;  शेतकऱ्यांशी जोडलेली नाळ      आज दि २६ डिसेंबर रोजी घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे आमदार हिकमत उढाण यांचा डहाळेगाव पिरगायबवाडी आणि देववगर तांडा येथील गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत केला. खास गोष्ट म्हणजे, आमदार उढाण यांनी या दौऱ्यात एका शेतकऱ्याच्या बैलगाडीतून प्रवास केला, ज्यामुळे त्यांच्या लोकांना त्यांच्या सादगीची आणि जुडलेल्या कार्याची झलक मिळाली.    आमदार उढाण यांच्या या प्रवासात गावकऱ्यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले, "माझ्या मतदारसंघातील लोक मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खूप आशेने आणि प्रेमाने बघत आहेत. हे प्रेम आणि विश्वासच मला लढण्याची ताकद देत आहे. माझ्या कार्यामुळे जनता खुश आहे आणि याच विश्वासावर मी काम करत आहे."    हिकमत उढाण यांच्या नेतृत्वाखाली घनसावंगी विधानसभा क्षेत्रात विकासाचे कार्य वेगाने प्रगती करेल. त्यांचे कार्य आणि त्यांच्या जनतेशी असलेले नाते अधिक दृढ होईल असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे. आमदार उढाण यांचा ही सादगी आणि विक...

धक्कादायकः भावी पतीसमोरच नराधमाचा तरुणीवर अत्याचार!

Image
  धक्कादायकः जालन्यात  भावी पतीसमोरच नराधमाचा  तरुणीवर अत्याचार !   नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..   जालन्यात अत्यंत धक्कादायकः घटना घडली असून एका तरुणीच्या भावी पतीला ठार मारण्याची धमकी देत, एका नराधमाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केलाय.   याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की काल बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास, जालन्यातील रेल्वे स्थानकावर भावी पतीला जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या २० वर्षीय तरुणीला तिच्या भावी पतीसह रेल्वे भुयारी पुलाखालून घराकडे जात असताना अंधारात प्रेम रवी पाचगे (र. नूतन वसाहत, जालना) या आरोपीने अचानक थांबवले. त्याने तरुणीला बाजूला बोलावले आणि तिला नाल्याकडे नेले. त्याठिकाणी तिच्या भावी पतीला ठार मारण्याची धमकी देत, त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पोलिसांची तातडीची कारवाई: भावी पती आणि तरुणीने आरोपीच्या तावडीतून सुटका केली आणि कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने, सहायक पोलीस निरीक्षक अमित म्हस्के, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलिस उपनिरीक्षक किशोर वनवे आणि पोलिस हवालदार नंदकिशोर ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल

Image
  संतोष देशमुख हत्या प्रकरणात  सीआयडीचे अप्पर पोलीस  महासंचालक बीडमध्ये दाखल वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    संपूर्ण महाराष्ट्र भरात गाजत असलेले व सर्व स्तरातून निषेध वेक्त होत असलेले बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची गुढ आणि तणावपूर्ण चौकशी आता सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. २६ डिसेंबर रोजी राज्याच्या सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल झाले असून, पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस महासंचालकांची बैठक पोलीस कार्यालयात सुरु आहे.   संतोष देशमुख यांच्या हत्येला अठरा दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र अद्याप तीन आरोपी फरार आहेत. शनिवारी २८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या प्रकरणातील राजकीय तणाव अधिकच वाढला आहे.    या हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिकी कराड यांच्या कडे संशयाचा इशारा दिला जात आहे, आणि त्यांना अटक होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी ठ...

दोन लहान बहिणींची हत्या ! ड्रममध्ये छिन्नविछिन्न मृतदेह आढळले

Image
 दोन लहान बहिणींची हत्या ! ड्रममध्ये छिन्नविछिन्न मृतदेह आढळले     पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये २५ डिसेंबर रोजी एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजवली आहे. दोन लहान बहिणी खेळताना अचानक बेपत्ता झाल्या, आणि त्यांचा शोध घेतल्यावरही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. रात्री उशिरा, शहराच्या बाहेर एका इमारतीच्या बाजूला एका ड्रममध्ये त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले. अशी प्राथमिक माहिती हाती येत आहे.   सदरील माहिती परिवाराला कळल्या नंतर  परिसर हादरून गेला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, प्राथमिक तपासानुसार मुलींच्या हत्या व लैंगिक अत्याचाराच्या शक्यतांचा विचार केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे, आणि हत्येचे कारण व आरोपींचा शोध घेत आहेत.   या घटनाशी संबंधित असलेली आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, कल्याणमधील आत्याचार व हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विशाल गवळीला शेगाव येथील श्रीकृपा जेन्टस पार्लर या सलूनमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने आपली ओळख लपविण्यासाठी सलूनमध्ये दाढी काढली होती, परंतु त्याचवेळी...

ग्रामीण भागातील कलाकाराचा उंच झेंडा, किशोर उढाणला 'सर्वोत्तम कलाकार' पुरस्कार

Image
  ग्रामीण भागातील कलाकाराचा उंच झेंडा, किशोर उढाणला 'सर्वोत्तम कलाकार' पुरस्कार   जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथील तरुण कलाकार किशोर ज्ञानेश्वर उढाण यांनी आपल्या अभिनय कौशल्याने ग्रामीण भागातील कलागुणांना नवीन उंचीवर नेले आहे. पायपीट फिल्म्स निर्मित 'मुक्ता - आर्टिकल 21' या लघुपटासाठी किशोर उढाण यांची सर्वोत्तम कलाकार म्हणून निवड झाली आहे.   पहिल्या अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल मध्ये सन्मानित करण्यात आलेल्या किशोर उढाण यांचे विशेष कौतुक होत आहे कारण या फेस्टिव्हलमध्ये १८० पेक्षा अधिक देश-विदेशातील लघुपट सादर झाले होते. त्यातून ६० लघुपट अंतिम फेरीत निवडले गेले आणि त्यात किशोर यांनी साकारलेली सरांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात विशेष ठरली.   किशोर उढाण यांनी याआधी "शिवाजी अंडरग्राऊंड भीम नगर मोहल्ला" या लोकप्रिय नाटकात सहकलाकार म्हणूनही काम केले आहे. ग्रामीण भागात राहून शेती व नोकरी सांभाळून आपल्या कलागुणांना त्यांनी जागतिक पातळीवर नेले आहे. आपल्या आवडीला जपण्याचे आणि त्यात प्राविण्य मिळवण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे किशोर उढाण    त्यांच या यश...

जालना: कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चार महिलांना अटक

Image
  जालना: कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चार महिलांना अटक     जालना शहरातील संजयनगर भागात एका कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकून एका महिलेसह तीन वेश्यांना रंगेहात पकडले आहे. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली. या कारवाईत एका महिलेच्या घरात चालवला जाणारा कुंटणखाना आज २५ डिसेंबर रोजी उध्वस्त करण्यात आला.    पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत घरातून कंडोमचा साठा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. ग्राहकांकडून वेश्याव्यवसायासाठी घेतले जाणारे पैसे या कुंटणखान्याची मालकीण स्वतःकडे ठेवत असे आणि उर्वरित रक्कम पीडित महिलांना देत असे.   ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची आर्थिक स्थिती हलाखीची असून, त्यापैकी दोन महिला पतीपासून विभक्त आहेत. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यासाठी हवामानाचा इशारा: यलो अलर्ट जारी

Image
  जालना जिल्ह्यासाठी हवामानाचा इशारा: यलो अलर्ट जारी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात 26 डिसेंबर 2024 रोजी तुरळक पावसाचा अंदाज असून 27 आणि 28 डिसेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यलो अलर्टच्या अनुसार या दोन दिवसांत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपीट आणि जोरदार वारे (50-60 किमी प्रतितास वेगाने) होण्याची शक्यता आहे.   या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रमुख सुचनांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे: 1. मेघगर्जना व विजेच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या: विजेपासून संरक्षणासाठी झाडाखाली थांबणे टाळावे. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचे टाळावे. 2. विद्युत उपकरणे वापर टाळा: गडगडाटी वादळादरम्यान विद्युत उपकरणांचा वापर करू नये व सुवाहक धातूंशी संपर्क टाळावा 3. विद्युत खांब आणि धातुच्या वस्तूंना स्पर्श करू नका: विद्युत खांब, टॉवर्स किंवा धातुच्या कुंपणांपासून दूर राहा. 4. मोकळ्या मैदानात सुरक्...

विद्यार्थ्यांच्या गणवेशाची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीवर

Image
  विद्यार्थ्यांच्या गणवेशाची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीवर.. शालेय शिक्षण, क्रीडा विभागाने निर्गमित केला आदेश.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचा गणवेश मिळाला नाही. आता अधिवेशनात 'एक राज्य एक गणवेश' असा संकल्प करीत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी २० डिसेंबरला आदेश निर्गमित केला. मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीवर निश्चित केली आहे. त्यामुळे आता शाळा व्यवस्थापन समितीच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध करून देणार आहे.    शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी, उद्भवलेल्या तक्रारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना आदींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पद्धतीने देण्याची मागणी केली होती. या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार होत मो...

घनसावंगी- अंबड रोडवरील त्या अपघातात उसाच्या ट्रॅक्टरला धडकून एकजण ठार

Image
घनसावंगी- अंबड रोडवर  उसाच्या ट्रॅक्टरला धडकून एकजण ठार ! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      अंबड ते घनसावंगी मार्गावरील मोहापुरी फाट्याजवळ रविवारी रात्री झालेल्या अपघातात उसाच्या ट्रॅक्टरला धडकून एकजण ठार तर एकजण गंभीर जखीम झालंय. दुचाकीवरील दोघेही छत्रपती संभाजी नगर येथील होते. यात प्रवीण रामू गायकवाड यांचा मृत्यू झालाय.    काल रविवारी रात्री १०:३० वाजता एक भीषण अपघात झाला होता घनसावंगीहून अंबड कडे जात असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून एका दुचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघात एकजण ठार तर एक जण जखमी झालाय.   दुचाकी क्रमांक mh २० ep ६८६३ वरील छत्रपती संभाजी नगर येथील प्रवीण गायकवाड व आशिक शुक्ला हे दोघे जण अंबड कडे जात होते यावेळी मोहपुरी फाट्याच्या पुढे काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून घडकली यात दोघनाही मार लागल्यामुळे दोघेही बेशुद्ध होऊन रोडवर पडले होते..  घटनास्थळी उपस्थित लक्ष्मण पवार, नारायण तारगे, बापूराव पवार आणि सुशील देशमुख यांनी तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेतून घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयात हलवले होते. डॉक...