अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

आमदार हिकमत उढाण यांचा बैलगाडीतून प्रवास; शेतकऱ्यांशी जोडलेली नाळ

आमदार हिकमत उढाण यांचा

 बैलगाडीतून प्रवास;

 शेतकऱ्यांशी जोडलेली नाळ 


   आज दि २६ डिसेंबर रोजी घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे आमदार हिकमत उढाण यांचा डहाळेगाव पिरगायबवाडी आणि देववगर तांडा येथील गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत केला. खास गोष्ट म्हणजे, आमदार उढाण यांनी या दौऱ्यात एका शेतकऱ्याच्या बैलगाडीतून प्रवास केला, ज्यामुळे त्यांच्या लोकांना त्यांच्या सादगीची आणि जुडलेल्या कार्याची झलक मिळाली.


   आमदार उढाण यांच्या या प्रवासात गावकऱ्यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले, "माझ्या मतदारसंघातील लोक मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खूप आशेने आणि प्रेमाने बघत आहेत. हे प्रेम आणि विश्वासच मला लढण्याची ताकद देत आहे. माझ्या कार्यामुळे जनता खुश आहे आणि याच विश्वासावर मी काम करत आहे."

   हिकमत उढाण यांच्या नेतृत्वाखाली घनसावंगी विधानसभा क्षेत्रात विकासाचे कार्य वेगाने प्रगती करेल. त्यांचे कार्य आणि त्यांच्या जनतेशी असलेले नाते अधिक दृढ होईल असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे. आमदार उढाण यांचा ही सादगी आणि विकासात्मक कार्याची जोड, त्यांना जनतेच्या मनात एक विशिष्ट स्थान निर्माण करते.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या