अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

तीर्थपुरीत तरुणाचा मृत्यू ; नातेवाईकातून घातपाताचा संशय

 तीर्थपुरीत तरुणाचा मृत्यू ;

नातेवाईकातून घातपाताचा संशय



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे आज ३१ डिसेंबर मंगळवारी एक दुःखद घटना समोर आली आहे. मूळ गाव पीरगैबवाडी येथील राजू छबू कोळेकर (वय २८ वर्षे) यांचा मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी तीर्थपुरी ते अंबड रोडवर दुपारच्या सुमारास मृतदेह आढळला. 


  त्यांनतर तीर्थपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, पोहेको नारायण माळी यांनी तत्काळ राजूस प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी येथे हलवले असता वैदकिय अधिकारी डॉ एस डी घुले यांनी तपासून राजूस मयत घोषीत केले.


   राजुच्या बहिणी यांनी सांगितले की राजू ची पत्नी तीन महिन्यांपासून तीर्थपुरी येथील एका धाब्यावर भांडे घासण्याचे काम करत होती. तीन दिवसापूर्वी राजू पुण्याहून तीर्थपुरी ला आला होता घटनेच्या दिवशीच राजू ने दुपारी १:३० वाजता त्यांचे रुई येथील मेहुने परमेश्वर लक्ष्मण गव्हाणे यांना मोबाईलवर फोन करून तीर्थपुरी येथे बोलावले होते. ते आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

   दरम्यान राजुच्या बहिणी सिला परमेश्वर गव्हाणे व गोकुला सुदाम देशमुख यांनी त्याच्या मृत्यू वर घातापाताचा संशय वेक्तः केला असून याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत शव विच्छेदन झाले नव्हेत याप्रकरणी त्यांचे नातेवाईक उशिरा तीर्थपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. राजू याच्या पश्यात पत्नी, भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.



दरम्यान राजुचे प्रेत शव विच्छेदन साठी तीर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते त्यावेळी राजुच्या अंगावर, हातावर जखमा आढलून आल्या यामुळे त्याचा घातपात झाल्याच्या संशयाला जागा मिळाली असून या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या ? कुणी केल्या? कधी केल्या या प्रश्नाची उत्तरे मात्र समजू शकले नाही.

Comments

Popular posts from this blog