अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

दोन अल्पवयीन बहिणींची अत्याचार करून हत्या; आरोपीच्या एन्काऊंटरची मागणी

 दोन अल्पवयीन बहिणींची अत्याचार करून हत्या; आरोपीच्या एन्काऊंटरची मागणी


  पुण्यातील कल्याण येथे अल्पवयीन मुलीचे अत्याचारातून हत्येचे प्रकरण घडल्यानंतर राजगुरुनगर येथेही असाच काहीसा प्रकार घडला. राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन बहिणींच्या अत्याचारानंतर झालेल्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. संशयीत आरोपी अजय दास (वय ५४), याने या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपीला परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करताना अटक केली आहे.

   या घटनेनंतर पुण्यातील भटक्या विमुक्त समाजाने तीव्र निदर्शने केली असून, समाजातील गोसावी समाजाने आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आंदोलकांनी आरोपीचा "हैदराबाद पॅटर्न" प्रमाणे एन्काऊंटर करून भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे.

  भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांनी आरोप केला आहे की, सरकारने त्यांना दुर्लक्षित केले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत त्यांना संरक्षण दिले जावे आणि या घटनेतील मृत मुलींच्या पालकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी.

  सरकारकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईसाठी समाजाचा दबाव वाढत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या