घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

दोन अल्पवयीन बहिणींची अत्याचार करून हत्या; आरोपीच्या एन्काऊंटरची मागणी

 दोन अल्पवयीन बहिणींची अत्याचार करून हत्या; आरोपीच्या एन्काऊंटरची मागणी


  पुण्यातील कल्याण येथे अल्पवयीन मुलीचे अत्याचारातून हत्येचे प्रकरण घडल्यानंतर राजगुरुनगर येथेही असाच काहीसा प्रकार घडला. राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन बहिणींच्या अत्याचारानंतर झालेल्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. संशयीत आरोपी अजय दास (वय ५४), याने या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपीला परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करताना अटक केली आहे.

   या घटनेनंतर पुण्यातील भटक्या विमुक्त समाजाने तीव्र निदर्शने केली असून, समाजातील गोसावी समाजाने आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आंदोलकांनी आरोपीचा "हैदराबाद पॅटर्न" प्रमाणे एन्काऊंटर करून भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे.

  भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांनी आरोप केला आहे की, सरकारने त्यांना दुर्लक्षित केले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत त्यांना संरक्षण दिले जावे आणि या घटनेतील मृत मुलींच्या पालकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी.

  सरकारकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईसाठी समाजाचा दबाव वाढत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या