अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल

 संतोष देशमुख हत्या प्रकरणात

 सीआयडीचे अप्पर पोलीस

 महासंचालक बीडमध्ये दाखल


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  संपूर्ण महाराष्ट्र भरात गाजत असलेले व सर्व स्तरातून निषेध वेक्त होत असलेले बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची गुढ आणि तणावपूर्ण चौकशी आता सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. २६ डिसेंबर रोजी राज्याच्या सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल झाले असून, पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस महासंचालकांची बैठक पोलीस कार्यालयात सुरु आहे.

  संतोष देशमुख यांच्या हत्येला अठरा दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र अद्याप तीन आरोपी फरार आहेत. शनिवारी २८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या प्रकरणातील राजकीय तणाव अधिकच वाढला आहे.

   या हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिकी कराड यांच्या कडे संशयाचा इशारा दिला जात आहे, आणि त्यांना अटक होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. पोलीस प्रशासनाने प्रकरणाच्या तपासामध्ये अधिक गती आणली असून, संबंधित आरोपींच्या मागावर विशेष पथके कार्यरत आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या