घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल

 संतोष देशमुख हत्या प्रकरणात

 सीआयडीचे अप्पर पोलीस

 महासंचालक बीडमध्ये दाखल


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  संपूर्ण महाराष्ट्र भरात गाजत असलेले व सर्व स्तरातून निषेध वेक्त होत असलेले बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची गुढ आणि तणावपूर्ण चौकशी आता सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. २६ डिसेंबर रोजी राज्याच्या सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल झाले असून, पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस महासंचालकांची बैठक पोलीस कार्यालयात सुरु आहे.

  संतोष देशमुख यांच्या हत्येला अठरा दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र अद्याप तीन आरोपी फरार आहेत. शनिवारी २८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या प्रकरणातील राजकीय तणाव अधिकच वाढला आहे.

   या हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिकी कराड यांच्या कडे संशयाचा इशारा दिला जात आहे, आणि त्यांना अटक होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. पोलीस प्रशासनाने प्रकरणाच्या तपासामध्ये अधिक गती आणली असून, संबंधित आरोपींच्या मागावर विशेष पथके कार्यरत आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या