अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

झोपेतच भाविकांवर काळाचा घाला: ट्रक आणि बसचा भीषण अपघात, दोनजण ठार, ३० जखमी

 झोपेतच भाविकांवर काळाचा घाला: ट्रक आणि बसचा भीषण अपघात, दोनजण ठार, ३० जखमी


   पंढरपूरजवळ रविवारी पहाटे भटुंबरे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत. हा अपघात भाविकांची बस आणि ट्रक समोरासमोर धडकल्याने झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे समोरील भाग अक्षरशः चिरडले गेले.

  अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्वरीत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात बसमधील बेबाबाई महाळसकर (वय ५५) आणि जनाबाई महाळसकर (वय ७) यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळाली.

  या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, यापैकी १२ जण गंभीर आहेत. त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, अपघात कशामुळे झाला याबाबत चौकशी सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या