Posts

Showing posts from January, 2025

जालना - सहाय्यक महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात

Image
  जालना - सहाय्यक महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात    जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा कार्यवाही केली. यामध्ये आरोपी लोकसेवक देवानंद कारभारी डोईफोडे, वय ३७ वर्षे, पद - सहायक महासूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड येथे कार्यरत असलेल्या व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपीने एका तक्रारदाराकडून शासकीय प्रक्रियेसाठी मागितलेली लाच स्वीकारल्याची ही घटना आहे. तक्रार:   तक्रारदार, वय २९ वर्षे, राहणार शिंदे वडगांव, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना यांनी त्यांचे मुलाचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी ५७ रुपये फी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने भरली होती. परंतु, आरोपी लोकसेवक देवानंद डोईफोडे यांनी शासकीय प्रक्रियेसाठी अतिरिक्त दोन हजार रुपयांची लाच मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. सापळा कार्यवाही   लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या तक्रारीनुसार दिनांक ३१ जानेवारी रोजी पडताळणी केली. आरोपीने पंचांच्या समक्ष दोन हजार रुपयांची लाचेची मागणी क...

तीन वर्षाच्या मुलींचा शोध लागत नसल्यामुळे अंबड तहसील कार्यालयावर मूक मोर्चा

Image
  तीन वर्षाच्या मुलींचा शोध लागत नसल्यामुळे अंबड तहसील कार्यालयावर मूक मोर्चा  अंबड शहरातील फैसलाबाद कॉलनीत १२ जानेवारी रोजी, रविवारी, शेख अमजद हाजी यांची तीन वर्षांची मुलगी इकरा घराबाहेर खेळण्यासाठी गेली, मात्र ती अद्याप घरी परतली नाही. तिच्या बेपत्ताबद्दल कुटुंबियांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली तरी, पोलिसांना तिचा शोध लावण्यात अद्याप यश आलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आज, ३१ जानेवारी रोजी, अंबड तहसील कार्यालयावर एक शांततापूर्ण मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे इकराचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व शेख अमजद हाजी यांच्या कुटुंबाने केले, तर अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. मोर्चा शांततेत पार पडला, मात्र नागरिकांनी शासन आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी ठाम भूमिका घेतली. मोर्चाच्या शेवटी अंबड तहसीलद...

जालना शेतकऱ्यांची कर्जमाफी व विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Image
  शेतकऱ्यांची कर्जमाफी व विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जालना: शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवला. मुख्य मागण्यांमध्ये कर्जमाफी आणि पीकविम्याची अग्रिम रक्कम लवकरात लवकर देणं, याचाही समावेश आहे. संघटनेनं दावा केला आहे की, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान सरकारकडून मंजूर झालं असलं, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर ते वर्ग झालेलं नाही. त्यामुळे हे अनुदान तातडीनं खात्यात वर्ग करावं, अशी मागणी जोर धरत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितलं की, “शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत आहे. कर्जाच्या बोजाखाली असलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारनं तातडीनं कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.” तसेच, आंदोलनकर्त्यांनी पीकविम्याची रक्कम लवकरात लवकर वितरित करण्याचीही मागणी केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या अडचणींना तोंड देण्यासाठी थोडा दि...

अंबड - हिंस्त्र प्राण्यांनी पाडला कालवडीचा फडशा

Image
  अंबड तालुक्यात हिंस्र प्राण्यांनी पाडला कालवडीचा फडशा   गोंदी गावात घडली घटना  गोंदी येथील ग्रामस्थांना एक भयावह घटना अनुभवयाला मिळाली. ग्रामस्थ संभाजी एकनाथ सोळुंके यांच्या गट क्र. ४१५ मध्ये असणाऱ्या १८ महिन्यांच्या कालवडीला अज्ञात हिंस्र प्राण्यांनी फडशा पाडला ही गुरुवारच्या रात्री ही घटना घडल्याचे समजते.यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संभाजी सोळुंके यांच्या शेतातील कालवड रात्रीच्या वेळी शेतात चराई करत असताना अचानक अज्ञात प्राण्यांनी तिला हल्ला करून तिचा फडशा पाडला सदरील माहिती वन विभागाला कळविण्यात आली असून वन विभागाने पंचनामा केला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.   गावकरी यांच्या म्हणण्यानुसार, हे हिंस्र प्राणी यापूर्वी देखील शेतातील जनावरांना लक्ष्य करत होते, परंतु अशी गंभीर घटना पहिल्यांदा घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी आता आपल्या जनावरांची काळजी घ्यावी लागणार असून, वनविभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

जालन्यात दरोडेखोरांनी युवकावर गोळीबार करत केली लूट

Image
  जालन्यात दरोडेखोरांनी युवकावर गोळीबार करत केली लूट जालन्यातील नागेवाडीजवळ महामार्गावर गुरुवारी रात्री घडलेली घटना, युवक गंभीर जखमी   जालन्याजवळील नागेवाडी परिसरात गुरुवारी रात्री सुमारे 10.15 वाजता घडलेल्या एका भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. दरोडेखोरांनी गावठी पिस्तूलातून गोळीबार करत एका 17 वर्षीय युवकाला लुटले. युवकाला छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे, आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटना कशी घडली चंदनझिरा भागातील स्क्रॅप व्यापारी शेख इ म्रान शेख एजाज हा युवक आपली ब्रेझा कार दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांची रक्कम घेऊन संभाजीनगर येथे गेला होता. कार दुरुस्तीनंतर 1 लाख 5 हजार रुपयांचे बिल भरून तो रात्री जालन्याकडे निघाला. नागेवाडी शिवारात असलेल्या गोदामात कार उभी करून, मोटारसायकलने घरी जाण्याच्या तयारीत असताना ही दुर्घटना घडली. झटापटीत गोळीबार नागेवाडी परिसरात असलेल्या एका  अमृततुल्य चहा हॉटेल'जवळ इम्रान यास तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या तीन दरोडेखोरांनी पैसे देण्याची धमकी दिली, ने. दरोडेखोरांनी इम्रानला नने विरो...

जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित, सरकारने काही मागण्या मान्य केल्याने तात्पुरती शांतता

Image
  जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित, सरकारने काही मागण्या मान्य केल्याने तात्पुरती शांतता   मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली येथे सुरु असलेल्या सामूहिक आमरण उपोषणाला आज दि ३० जानेवारी रोजी सहावा दिवस होता. या आंदोलनात सहभागी आंदोलकांनी सरकारकडून काही मागण्या मान्य झाल्यानंतर, तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.   सरकारने मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी चार मागण्या मान्य केल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात आंदोलकांनी पुढील कृतीबाबत देखील स्पष्टता दिली आहे. मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन पुन्हा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मान्य झालेल्या मागण्या १. कुणबी नोंदी शोधण्यासाठी समितीला मुदतवाढ: न्या. शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या नोंदी शोधण्याचे काम सुरू राहणार आहे. २. हैद्राबाद गॅझेटिअर तपासणी: हैद्राबाद गॅझेटिअरच्या तपासणीसाठी न्या. शिंदे समितीकडून अहवाल मागवण्यात येईल आणि त्यावर उचित कार्यवाही केली जाईल. ३. गुन्हे मागे घेण्याचा निर्णय: मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता इ...

अंबड येथे लुटमारीची घटना ठरली बनावट; फिर्यादीने वैयक्तिक कारणांमुळे खोटी फिर्याद दिली

Image
  अंबड येथे लुटमारीची घटना ठरली बनावट; फिर्यादीने वैयक्तिक कारणांमुळे खोटी फिर्याद दिली   अंबड: पाचोड रोडवर एसबीआय बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र चालक मयूर वाव्हळ यांनी सकाळी ९:१५ वाजता त्रिमूर्ती कॉम्प्युटरजवळ चाकूचा धाक दाखवत लुटमारी झाल्याची खोटी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीच्या मते, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकू दाखवून रोख रक्कम 42,700 रुपये लुटल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिस तपासातून उघड झाले की ही घटना पूर्णपणे बनावट होती आणि वाव्हळ यांनी वैयक्तिक कारणांमुळे हा बनाव रचला होता. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.   घटनेच्या तक्रारीनंतर अंबड पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी व अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास केला. मात्र, लुटमारीचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. संशयास्पद वाटताच पोलिसांनी वाव्हळ यांची चौकशी केली. चौकशीतून उघड झाले की वाव्हळ यांनी आर्थिक अडचणी व वैयक्तिक ताणामुळे या बनावट घटनेची आखणी केली होती. अशी माहिती मिळाली.  अंबड पोलिसांनी वाव्हळ यांना खोटी माहिती दिल्याबद्दल व समाजात घबराट पसरवण्याच्या प्रयत्न केला यानं...

जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

Image
  जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द: राज्यात खळबळ राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या नामनिर्देशित आणि निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे संबंधित जिल्ह्यांतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाने २८ जानेवारी २०२५ रोजी या संदर्भात आदेश जारी केला असून, जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशानुसार पुढील सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे स्वरूप राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी काढलेल्या या आदेशात, जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित तसेच निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती देऊन जिल्हा नियोजन समित्यांचे नव्याने पुनर्रचनेचे आदेश दिले आहेत. यामुळे अनेक सदस्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. अनेक नामनिर्देशित सदस्यांनी आपल्या निय...
Image
  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी पुन्हा लांबणीवर वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबतची सुप्रीम कोर्टात आज मंगळवारी (२८ जानेवारी) सुनावणी होती. परंतु, ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडून निवडणुकांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  आज झालेल्या सुनावणीत निवडणुक आयोग आणि राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेली माहिती आणि मुद्द्यांवर चर्चा झाली. न्यायालयाने त्यानंतर पुढील सुनावणीसाठी २५ फेब्रुवारीचा दिवस निश्चित केला आहे. त्यावेळी निवडणुकांच्या तारखा आणि अन्य महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडत असल्याने अनेक जिल्ह्यांतील प्रशासनिक प्रक्रिया थांबलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा विविध स्तरांवरील निव...

मनोज जरांगे पाटील यांची आ उढाण यांनी घेतली भेट

Image
  अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची आ उढाण यांनी घेतली भेट   अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी पूर्वीही उपोषण केले होते, मात्र सरकारच्या आश्वासनावर त्यांनी ते थांबवले होते. आता पुन्हा एकदा आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आज घनसावंगीचे आमदार डॉ हीकमत उढाण यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषण थांबवण्याची विनंती केली मात्र जरांगे पाटलांनी ती नाकारली.   आमदार हिकमत उढाण यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या. पुढे ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आरक्षण व उपोषण या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती करतो असे सांगितले.  जरांगे पाटील यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करताना, आ उढाण यांनी हे उपोषण थ...

अंबड तालुक्यात दुचाकी अपघातात तीर्थपुरीतील तरुण ठार, एक गंभीर

Image
अंबड तालुक्यात दुचाकी अपघातात तीर्थपुरीतील तरुण ठार, एक गंभीर ! कुरण फाटा,शहागडजवळ घडली दुर्दैवी घटना   वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    अबंड तालुक्यातील गोंदी-शहागड राज्य महामार्गावर शनिवारी, २५ जानेवारी रोजी, सायंकाळी ४ वाजता एका दुचाकी अपघातात तीर्थपुरी येथील एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. कुरण फाटा येथे घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सतीश अरून जाधव वय ४० वर्षे (मूळ गाव रामसगाव हमु तीर्थपुरी ता घनसावंगी) असे मयत तरुणाचे नाव आहे.   सतीश व सुरेश हे दोघे ते दुचाकीवरून शहागडहून तीर्थपुरीकडे जात होते. अचानक समोर आलेल्या वाहनामुळे त्यांनी दुचाकीचा डिस्क ब्रेक जोरात दाबला, परिणामी तोल जाऊन ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यात सतीश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.ए.स.आय डी जी कंटुले यांनी अपघात स्थळी मदत केली    दुचाकीच्या पाठीमागे बसलेले सुरेश मंकाजी वानखेडे (रा. तीर्थपुरी, ता. घनसावंगी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अंबड येथील रुग्णालयात दाखल...

ज्ञानराधाच्या ठेवीधारकांसाठी महत्त्वाची सूचना

Image
  ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी, बीड: ठेवीधारकांसाठी महत्त्वाची सूचना वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    बीड निबंधक कार्यालयात ठेवीधारकांकडून एफडी दस्तऐवज जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन सर्व ठेवीधारकांना सूचित करण्यात येत आहे की, गर्दी होऊ नये व ठेवीधारकांना अनावश्यक त्रास होऊ नये म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सन्माननीय अवसायक (Liquidator) समृत जाधव यांच्या सोबत एल. बी. सावंत यांनी संभाषण केले, ज्यामध्ये त्यांनी विनंती केली की ठेवीधारकांनी आपले एफडी दस्तऐवज प्रत्यक्ष कार्यालयात आणण्याऐवजी ईमेलद्वारे जमा करावेत. या संदर्भात जाधव यांनी समाधानकारक उत्तर दिले असून, आज संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करण्याचे आश्वासन दिले आहे. तरी सर्व ठेवीधारकांनी विनाकारण परेशान न होता, आपले दस्तऐवज पीडीएफ फाईलच्या स्वरूपात खालील ईमेल आयडीवर पाठवावे:  आपली गैर सोय होवू नये म्हणुन आपण समक्ष उपस्थित न राहता ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या ई-मेल dnyanradhaliquidator@gmail.com वर आपला अर्ज पाठविण्यात यावा. वरील बाब सर्व...

अंबड घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी निवडणूकीमुळे ऊस बीलाची रेलचेल यावर्षी मात्र जेमतेम

Image
  अंबड घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी निवडणूकीमुळे ऊस बीलाची रेलचेल यावर्षी मात्र जेमतेम  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    अंबड आणि घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी ऊस बिलांची मोठी रक्कम मिळाली होती, मात्र यावर्षी ऊस बिलात जेमतेम रक्कम दिली जात आहे. असा आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. मागील वर्षीचे आकडे समर्थ/सागर सहकारी साखर कारखाना यांनी मागील वर्षी पहिल्या हप्त्याचे बिल २७०० रुपये दिले होते आणि शेवटच्या हप्त्यात ती रक्कम २९०० रुपयांवर पोहोचली होती. समृद्धी साखर कारखान्याने सुरुवातीला २८०० रुपये दिले आणि शेवटी २९०० रुपये दिले. ब्ल्यू सफायर यांनी पहिल्या हप्त्यात २७५१ रुपये दिले आणि शेवटच्या हप्त्यात २९५१ रुपयांवर गेले. यावर्षीची स्थिती या वर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे. समर्थ आणि समृद्धी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचे बिल केवळ २५०० रुपये दिले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे, येडेश्वरी साखर कारखान्याने अंबड घनसावंगी तालुक्यातील ऊस वाहतूक दूर असतानाही शेतकऱ्...

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार”

Image
  कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार” प्रदान वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    जालना जिल्ह्यातील प्रतिष्ठित "कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना" यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या शिखर संशोधन संस्थेकडून "सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार" देण्यात आला आहे. गळीत हंगाम २०२३-२४ साठी दिला गेलेला हा पुरस्कार कारखान्याच्या उद्योग क्षेत्रातील अग्रणी भूमिका आणि पर्यावरण कटिबद्धतेचा सन्मान आहे.   वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी पद्मविभूषण खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते समर्थ उद्योग समूहाचे मार्गदर्शक राजेश टोपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक अमरसिंह खरात, भागवत कटारे, सुधाकर खरात, नरसिंगराव मुंढे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत काही प्रमुख घटकांचा समावेश आहे: आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर: ...

भीषण रेल्वे अपघात: जीव वाचवण्यासाठी उड्या टाकणाऱ्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Image
भीषण रेल्वे अपघात: जीव वाचवण्यासाठी उड्या टाकणाऱ्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू   जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावणारी घटना घडली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या चाकांमध्ये घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर गाडीला आग लागल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. या अफवेने घाबरलेले प्रवासी गाडीबाहेर उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले.   मात्र दुर्दैवाने समोरून येणाऱ्या बंगळुरू-कर्नाटक रेल्वे गाडीखाली काही प्रवासी सापडले आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण: हा अपघात घातपात नाही     महाराष्ट्रातील एका दुर्दैवी रेल्वे अपघातानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सदर अपघात हा घातपात नसून अपघाती घटना आहे.   अपघाताच्या...

खाजगी शिकवणी घेणाऱ्याकडून तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Image
  घनसावंगी खाजगी शिक्षकी पेशाला काळीमा ! खाजगी शिकवणी घेणाऱ्याकडून तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग  पालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज घनसावंगी तालुक्यात दोन महिन्यातील तिसरी घटना  घनसावंगी तालुक्यात खाजगी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर येत असून एका खाजगी शिकवणी (वर्ग) घेणाऱ्या एकाने तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घनसावंगी तालुक्यात जवळपास दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे यामुळे पालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.   घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील खाजगी शिकवणी (वर्ग) घेणाऱ्या संशयित आरोपी किशोर तुकाराम आर्दड याने नमुद तारीख वेळी व ठीकाणी यातील पिडीत तीन मुली या यातील आरोपी याचे कडे खाजगी ट्युशनला जातात या आरोपीने मुली ट्युशनला गेल्यावर त्याच्या रखवालीमध्ये असतांना तसेच त्याला कायद्याची जान असतांनाही त्यास वारंवार त्याच्या मनाला व निर्माण होईल असे गैरवर्तन करुन अल्पवयीन लहान मुलींचा विनयभंग केला असे तक्रारीत नमूद केले आहे.   याप्रकरणी तीर...

नव्या वर्षात सर्वच सण पंधरा दिवस लवकर

Image
  नव्या वर्षात सर्वच सण पंधरा दिवस लवकर गणेशोत्सव ऑगस्टमध्ये : आषाढी आणि मोहरम एकाच दिवशी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण   २०२५ या नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे, आणि या वर्षात सणवार मागील वर्षांच्या तुलनेत बारा ते पंधरा दिवस आधी येणार आहेत. यंदा सर्वांच्याच मनात उत्साह निर्माण करणारा गणेशोत्सव सप्टेंबरऐवजी ऑगस्ट महिन्यात साजरा होणार आहे. याशिवाय, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोहरम आणि आषाढी एकादशी हे दोन सण एकाच दिवशी येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सणांच्या तारखांमध्ये बदल झालेला दिसतो. संक्रांत एक दिवस आधी तर महाशिवरात्र ११ दिवस, होळी १० दिवस, गणेशोत्सव १० दिवस, आणि दीपावली तब्बल २१ दिवस आधी आली आहे. नवीन वर्षातील महत्वाचे सण  मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी होती, तर महाशिवरात्र २६ फेब्रुवारीला आहे. होळी १३ मार्चला, रंगपंचमी १९ मार्चला, आणि गुढीपाडवा ३० मार्चला आहे. रमजान ईद ३१ मार्च रोजी साजरी होणार आहे. आषाढी एकादशी आणि मोहरम हे सण ६ जुलै रोजी एकाच दिवशी येणार आहेत. रक्षाबंधन ९ ऑगस्टला, गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला, अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबरला, घटस्थापना २२ ...

घनसावंगी तालुक्यात ऊसतोड हार्वेस्टरला अचानक आग; संपूर्ण मशीन जळून खाक

Image
  घनसावंगी तालुक्यात ऊसतोड हार्वेस्टरला अचानक आग; संपूर्ण मशीन जळून खाक   मौजे सिंदखेड, तालुका घनसावंगी येथे आज ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या हार्वेस्टरला आज २१ जानेवारी रोजी अचानक आग लागल्याने संपूर्ण मशीन जळून खाक झाले आहे. या घटनेत शेतकरी भागवत आश्रुबा आधुडे यांचे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.   ऊस तोडणीसाठी मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी हार्वेस्टरचा वापर करून ऊस तोडणी करत आहेत. घनसावंगी तालुक्यात ऊसाचे मोठे क्षेत्र असून, शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अंबड-घनसावंगी तालुक्यात इतर जिल्ह्यांतील ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर दाखल होत आहेत. मात्र, आजच्या घटनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य ठरले.   अशी अचानक लागणारी आग शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक समस्या निर्माण करत आहे, त्यामुळे मशीन मालक व शेतकरी यानी ऊसतोडणी यंत्राच्या वापराच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.

घनसावंगी तालुक्यात गूळ उद्योगातून तरुणांना मिळाला रोजगार; शेतकऱ्यांनाही फायदा

Image
  घनसावंगी तालुक्यात गूळ उद्योगातून तरुणांना मिळाला रोजगार; शेतकऱ्यांनाही फायदा  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       घनसावंगी तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत गूळ उद्योग सुरू केल्यामुळे तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळत आहे. तालुक्यात उक्कडगाव, नाथनगर, सिंदखेड, तीर्थपुरी येथे प्रत्येकी एक तर जोगलादेवी येथे चार गूळ युनिट उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे एकूण आठ गूळ युनिट्स कार्यरत आहेत. याबरोबरच अंकुशनगर समर्थ तर तीर्थपूरी येथील सागर सहकारी साखर कारखाना, देवी दहेगाव येथील समृध्दी शुगर्स तर कंडारी येथील ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग असे सर्व मिळून घनसावंगी तालुक्यात दररोज ऊसाचे गाळप होत आहे.   पैठणच्या नाथसागर धरणातुन डाव्या आणी उजव्या कालव्यातुन शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठी पाणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात ओलीताखाली येत आहे. यामुळे चोहीकडे हिरवेगार पिके डोलात उभी आसल्याचे दिसुन येते याच नाथसागर धरणातुन छञपती संभाजीनगर, जालना, अंबड, शहागड, गेवराई येथे पिण्याचा पाणीपुरवठा देखील होत आहे. याबरोबरच पैठण च...

वास्तव न्यूज मराठी: नवीन वर्षात एक नवा अध्याय आपणही घेऊ शकता सहभाग

Image
वास्तव न्यूज मराठी: नवीन वर्षात एक नवा अध्याय आपणही घेऊ शकता सहभाग आता करूया नव्या स्वप्नांची तयारी, यशाचे दार उघडण्याची हीच वेळ आली भारी   अल्पवधी कालावधीत सर्वसामान्य दर्षकात लोकप्रिय ठरलेल्या वास्तव न्यूज मराठी या लोकप्रिय पत्रकारिता माध्यमाने आपल्या वाचकांसाठी नवीन वर्षात एक अनोखी संधी दिली आहे. आपल्या समाजातील सर्वसामान्यांपासून विविध प्रतिनिधींना आपले विचार व्यक्त करण्याची आणि प्रेरणादायी कहाण्या मांडण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाचे ठळक मुद्दे :- १. प्रतिनिधींचे विचारमंथन: आपले पाहुणे   ग्रामीण पंचायत सरपंचापासून ते आमदारांपर्यंत (आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच) सर्वांना या व्यासपीठावर विचार मांडण्यासाठी आमंत्रित केले जाईल. २. शेत शिवार   उत्कृष्ट शेतकऱ्यांच्या यशोगाथा सादर करण्यात येतील, ज्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल आणि शेतीसाठी नवे मार्गदर्शन मिळेल. ३. उद्योजकता   यशस्वी उद्योजकांच्या कहाण्या नव्या पिढीला उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन करतील आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतील. ४. शिक्ष...

बीड - एसटी बसने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू !

Image
  बीड - एसटी बसने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू ! दुर्दैवी घटना: बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावावर शोककळा, पोलिस व्हायचं स्वप्नं अधुरं   बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गावातील तीन होतकरू तरुणांची दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. पोलीस भरतीच्या सरावादरम्यान एसटी बसने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना आज घडलीय  दुर्दैवी घटनेतील मृतांची ओळख: 1. सुबोध बाबासाहेब मोरे (वय २०) 2. विराट बब्रूवान घोडके (वय १९) 3. ओम सुग्रीव घोडके (वय २०)      हे तीनही युवक सामान्य घरांतील असून, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आधारस्तंभ बनण्याच्या स्वप्नाने पोलिस भरतीची तयारी करत होते. मात्र त्यांच्या कर्तृत्वाला दुर्दैवी अपघातामुळे पूर्णविराम मिळाला. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.   घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की, अपघातामुळे सर्वत्र गोंधळ आणि हळहळ पसरली होती. प्रशासनाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले....