अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

अंबड - हिंस्त्र प्राण्यांनी पाडला कालवडीचा फडशा

 अंबड तालुक्यात हिंस्र प्राण्यांनी पाडला कालवडीचा फडशा

 गोंदी गावात घडली घटना



 गोंदी येथील ग्रामस्थांना एक भयावह घटना अनुभवयाला मिळाली. ग्रामस्थ संभाजी एकनाथ सोळुंके यांच्या गट क्र. ४१५ मध्ये असणाऱ्या १८ महिन्यांच्या कालवडीला अज्ञात हिंस्र प्राण्यांनी फडशा पाडला ही गुरुवारच्या रात्री ही घटना घडल्याचे समजते.यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


संभाजी सोळुंके यांच्या शेतातील कालवड रात्रीच्या वेळी शेतात चराई करत असताना अचानक अज्ञात प्राण्यांनी तिला हल्ला करून तिचा फडशा पाडला सदरील माहिती वन विभागाला कळविण्यात आली असून वन विभागाने पंचनामा केला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

  गावकरी यांच्या म्हणण्यानुसार, हे हिंस्र प्राणी यापूर्वी देखील शेतातील जनावरांना लक्ष्य करत होते, परंतु अशी गंभीर घटना पहिल्यांदा घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी आता आपल्या जनावरांची काळजी घ्यावी लागणार असून, वनविभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या