घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी पुन्हा लांबणीवर


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबतची सुप्रीम कोर्टात आज मंगळवारी (२८ जानेवारी) सुनावणी होती. परंतु, ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडून निवडणुकांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 आज झालेल्या सुनावणीत निवडणुक आयोग आणि राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेली माहिती आणि मुद्द्यांवर चर्चा झाली. न्यायालयाने त्यानंतर पुढील सुनावणीसाठी २५ फेब्रुवारीचा दिवस निश्चित केला आहे. त्यावेळी निवडणुकांच्या तारखा आणि अन्य महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडत असल्याने अनेक जिल्ह्यांतील प्रशासनिक प्रक्रिया थांबलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा विविध स्तरांवरील निवडणुका होत असून त्यांना महत्त्व आहे. सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयानुसार निवडणुकांचे वेळापत्रक ठरवले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

 मे महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.

सारांश: 

  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबतची सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यावेळी निवडणुकीच्या तारखा आणि अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या