अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

बीड - एसटी बसने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू !

 बीड - एसटी बसने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू !

दुर्दैवी घटना: बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावावर शोककळा, पोलिस व्हायचं स्वप्नं अधुरं



  बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गावातील तीन होतकरू तरुणांची दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. पोलीस भरतीच्या सरावादरम्यान एसटी बसने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना आज घडलीय 

दुर्दैवी घटनेतील मृतांची ओळख:

1. सुबोध बाबासाहेब मोरे (वय २०)

2. विराट बब्रूवान घोडके (वय १९)

3. ओम सुग्रीव घोडके (वय २०)

  

  हे तीनही युवक सामान्य घरांतील असून, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आधारस्तंभ बनण्याच्या स्वप्नाने पोलिस भरतीची तयारी करत होते. मात्र त्यांच्या कर्तृत्वाला दुर्दैवी अपघातामुळे पूर्णविराम मिळाला. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.


  घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की, अपघातामुळे सर्वत्र गोंधळ आणि हळहळ पसरली होती. प्रशासनाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

   परिणाम आणि शोकभावना: या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबांनी आपल्या मुलांना अशा दुर्दैवी घटनेत गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणांच्या अपूर्ण स्वप्नांच्या छायेखाली संपूर्ण गाव शोकसागरात आहे.

  पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे आणि एसटी बसचालकाविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या