घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

बीड - एसटी बसने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू !

 बीड - एसटी बसने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू !

दुर्दैवी घटना: बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावावर शोककळा, पोलिस व्हायचं स्वप्नं अधुरं



  बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गावातील तीन होतकरू तरुणांची दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. पोलीस भरतीच्या सरावादरम्यान एसटी बसने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना आज घडलीय 

दुर्दैवी घटनेतील मृतांची ओळख:

1. सुबोध बाबासाहेब मोरे (वय २०)

2. विराट बब्रूवान घोडके (वय १९)

3. ओम सुग्रीव घोडके (वय २०)

  

  हे तीनही युवक सामान्य घरांतील असून, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आधारस्तंभ बनण्याच्या स्वप्नाने पोलिस भरतीची तयारी करत होते. मात्र त्यांच्या कर्तृत्वाला दुर्दैवी अपघातामुळे पूर्णविराम मिळाला. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.


  घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की, अपघातामुळे सर्वत्र गोंधळ आणि हळहळ पसरली होती. प्रशासनाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

   परिणाम आणि शोकभावना: या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबांनी आपल्या मुलांना अशा दुर्दैवी घटनेत गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणांच्या अपूर्ण स्वप्नांच्या छायेखाली संपूर्ण गाव शोकसागरात आहे.

  पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे आणि एसटी बसचालकाविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या