अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

मनोज जरांगे पाटील यांची आ उढाण यांनी घेतली भेट

 अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची आ उढाण यांनी घेतली भेट

  अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी पूर्वीही उपोषण केले होते, मात्र सरकारच्या आश्वासनावर त्यांनी ते थांबवले होते. आता पुन्हा एकदा आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आज घनसावंगीचे आमदार डॉ हीकमत उढाण यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषण थांबवण्याची विनंती केली मात्र जरांगे पाटलांनी ती नाकारली.


  आमदार हिकमत उढाण यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या. पुढे ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आरक्षण व उपोषण या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती करतो असे सांगितले.


 जरांगे पाटील यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करताना, आ उढाण यांनी हे उपोषण थांबवण्याचे आवाहन देखील केले आहे, पण जरांगे पाटील यांनी ठामपणे आपला निर्णय जाहीर केला आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय ते उपोषण सोडणार नाहीत.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या