अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार”

 कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार” प्रदान


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  जालना जिल्ह्यातील प्रतिष्ठित "कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना" यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या शिखर संशोधन संस्थेकडून "सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार" देण्यात आला आहे. गळीत हंगाम २०२३-२४ साठी दिला गेलेला हा पुरस्कार कारखान्याच्या उद्योग क्षेत्रातील अग्रणी भूमिका आणि पर्यावरण कटिबद्धतेचा सन्मान आहे.


  वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी पद्मविभूषण खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते समर्थ उद्योग समूहाचे मार्गदर्शक राजेश टोपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक अमरसिंह खरात, भागवत कटारे, सुधाकर खरात, नरसिंगराव मुंढे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत काही प्रमुख घटकांचा समावेश आहे:

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर: उत्पादन प्रक्रिया सुधारण्यासाठी कारखान्याने स्वयंचलित यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढली असून उत्पादन खर्चात लक्षणीय घट झाली आहे.

ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन: कारखान्याने ऊर्जा बचतीसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये एनर्जी एफिशिएंट मोटर्स, पंपांचा वापर आणि पर्यावरणपूरक इन्सीनरेशन तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी उपक्रम: उसाच्या लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार, खतांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन आणि उन्हाळी पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आले आहे.

सामाजिक जबाबदारी: कारखाना सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या पुरस्काराने समर्थ साखर कारखान्याच्या उद्योग क्षेत्रातील योगदानाला आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या योगदानाला मान्यता मिळाली आहे, ज्यामुळे संपूर्ण समर्थ उद्योग समूहासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या