अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

भीषण रेल्वे अपघात: जीव वाचवण्यासाठी उड्या टाकणाऱ्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

भीषण रेल्वे अपघात: जीव वाचवण्यासाठी उड्या टाकणाऱ्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू


  जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावणारी घटना घडली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या चाकांमध्ये घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर गाडीला आग लागल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. या अफवेने घाबरलेले प्रवासी गाडीबाहेर उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले.

  मात्र दुर्दैवाने समोरून येणाऱ्या बंगळुरू-कर्नाटक रेल्वे गाडीखाली काही प्रवासी सापडले आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण: हा अपघात घातपात नाही

 

  महाराष्ट्रातील एका दुर्दैवी रेल्वे अपघातानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सदर अपघात हा घातपात नसून अपघाती घटना आहे.

  अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पाटील म्हणाले की, "हा अपघात घातपात नाही, तरी चौकशी चालू असून संपूर्ण माहिती लवकरच उपलब्ध होईल." तसेच प्रशासनाने तात्काळ मदत कार्य हाती घेतले असून जखमींवर योग्य उपचार केले जात आहेत.

  दरम्यान, या घटनेमुळे मृत आणि जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Comments

Popular posts from this blog