अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

अंबड तालुक्यात दुचाकी अपघातात तीर्थपुरीतील तरुण ठार, एक गंभीर

अंबड तालुक्यात दुचाकी अपघातात तीर्थपुरीतील तरुण ठार, एक गंभीर !

कुरण फाटा,शहागडजवळ घडली दुर्दैवी घटना



 वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  अबंड तालुक्यातील गोंदी-शहागड राज्य महामार्गावर शनिवारी, २५ जानेवारी रोजी, सायंकाळी ४ वाजता एका दुचाकी अपघातात तीर्थपुरी येथील एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. कुरण फाटा येथे घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सतीश अरून जाधव वय ४० वर्षे (मूळ गाव रामसगाव हमु तीर्थपुरी ता घनसावंगी) असे मयत तरुणाचे नाव आहे.


  सतीश व सुरेश हे दोघे ते दुचाकीवरून शहागडहून तीर्थपुरीकडे जात होते. अचानक समोर आलेल्या वाहनामुळे त्यांनी दुचाकीचा डिस्क ब्रेक जोरात दाबला, परिणामी तोल जाऊन ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यात सतीश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.ए.स.आय डी जी कंटुले यांनी अपघात स्थळी मदत केली 


  दुचाकीच्या पाठीमागे बसलेले सुरेश मंकाजी वानखेडे (रा. तीर्थपुरी, ता. घनसावंगी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी जालना येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. सुरेश यांच्या डोक्याला आणि हाताला फ्रॅक्चर झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

मयत सतीश जाधव

  या अपघातामुळे स्थानिकांमध्ये शोककळा पसरली असून, महामार्गावर वाढणाऱ्या वाहनांची गती आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या