अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

अंबड घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी निवडणूकीमुळे ऊस बीलाची रेलचेल यावर्षी मात्र जेमतेम

 अंबड घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी निवडणूकीमुळे ऊस बीलाची रेलचेल यावर्षी मात्र जेमतेम 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  अंबड आणि घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी ऊस बिलांची मोठी रक्कम मिळाली होती, मात्र यावर्षी ऊस बिलात जेमतेम रक्कम दिली जात आहे. असा आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.

मागील वर्षीचे आकडे

समर्थ/सागर सहकारी साखर कारखाना यांनी मागील वर्षी पहिल्या हप्त्याचे बिल २७०० रुपये दिले होते आणि शेवटच्या हप्त्यात ती रक्कम २९०० रुपयांवर पोहोचली होती.

समृद्धी साखर कारखान्याने सुरुवातीला २८०० रुपये दिले आणि शेवटी २९०० रुपये दिले.

ब्ल्यू सफायर यांनी पहिल्या हप्त्यात २७५१ रुपये दिले आणि शेवटच्या हप्त्यात २९५१ रुपयांवर गेले.

यावर्षीची स्थिती

या वर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे. समर्थ आणि समृद्धी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचे बिल केवळ २५०० रुपये दिले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दुसरीकडे, येडेश्वरी साखर कारखान्याने अंबड घनसावंगी तालुक्यातील ऊस वाहतूक दूर असतानाही शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात २७०० रुपये दिले आहेत. मात्र स्थानिक कारखान्यांना वाहतूक जवळ असूनही पहिला हप्ता केवळ २५०० रुपये दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे आणि त्यांनी स्थानिक कारखानदारांवर शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.अनेक शेतकरी मागील वर्षीच्या व यावर्षीच्या ऊस बिलांमध्ये असलेल्या तफावतीवर नाराज आहेत.

Comments

Popular posts from this blog