अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

तीन वर्षाच्या मुलींचा शोध लागत नसल्यामुळे अंबड तहसील कार्यालयावर मूक मोर्चा

 तीन वर्षाच्या मुलींचा शोध लागत नसल्यामुळे अंबड तहसील कार्यालयावर मूक मोर्चा 


अंबड शहरातील फैसलाबाद कॉलनीत १२ जानेवारी रोजी, रविवारी, शेख अमजद हाजी यांची तीन वर्षांची मुलगी इकरा घराबाहेर खेळण्यासाठी गेली, मात्र ती अद्याप घरी परतली नाही. तिच्या बेपत्ताबद्दल कुटुंबियांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली तरी, पोलिसांना तिचा शोध लावण्यात अद्याप यश आलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

आज, ३१ जानेवारी रोजी, अंबड तहसील कार्यालयावर एक शांततापूर्ण मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे इकराचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी करण्यात आली.

मोर्चाचे नेतृत्व शेख अमजद हाजी यांच्या कुटुंबाने केले, तर अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. मोर्चा शांततेत पार पडला, मात्र नागरिकांनी शासन आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी ठाम भूमिका घेतली.


मोर्चाच्या शेवटी अंबड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ज्यात पोलिसांनी इकराच्या शोधासाठी अधिक चोख तपास करावा आणि कुटुंबाला न्याय मिळावा, याची मागणी करण्यात आली. इकराच्या हरवण्याची घटना शहरात संवेदनशीलतेने पाहिली जात असून, तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


  प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन, लवकरच तपासाची प्रगती होईल आणि इकराला सुखरूप घरी आणले जाईल, अशी अपेक्षा आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या