अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना शेतकऱ्यांची कर्जमाफी व विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 शेतकऱ्यांची कर्जमाफी व विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


जालना: शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवला. मुख्य मागण्यांमध्ये कर्जमाफी आणि पीकविम्याची अग्रिम रक्कम लवकरात लवकर देणं, याचाही समावेश आहे.

संघटनेनं दावा केला आहे की, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान सरकारकडून मंजूर झालं असलं, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर ते वर्ग झालेलं नाही. त्यामुळे हे अनुदान तातडीनं खात्यात वर्ग करावं, अशी मागणी जोर धरत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितलं की, “शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत आहे. कर्जाच्या बोजाखाली असलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारनं तातडीनं कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.”

तसेच, आंदोलनकर्त्यांनी पीकविम्याची रक्कम लवकरात लवकर वितरित करण्याचीही मागणी केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या अडचणींना तोंड देण्यासाठी थोडा दिलासा मिळेल.

आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या असून, त्यावर सरकार काय पावलं उचलतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या