घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

जालना शेतकऱ्यांची कर्जमाफी व विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 शेतकऱ्यांची कर्जमाफी व विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


जालना: शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवला. मुख्य मागण्यांमध्ये कर्जमाफी आणि पीकविम्याची अग्रिम रक्कम लवकरात लवकर देणं, याचाही समावेश आहे.

संघटनेनं दावा केला आहे की, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान सरकारकडून मंजूर झालं असलं, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर ते वर्ग झालेलं नाही. त्यामुळे हे अनुदान तातडीनं खात्यात वर्ग करावं, अशी मागणी जोर धरत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितलं की, “शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत आहे. कर्जाच्या बोजाखाली असलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारनं तातडीनं कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.”

तसेच, आंदोलनकर्त्यांनी पीकविम्याची रक्कम लवकरात लवकर वितरित करण्याचीही मागणी केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या अडचणींना तोंड देण्यासाठी थोडा दिलासा मिळेल.

आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या असून, त्यावर सरकार काय पावलं उचलतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या