घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना शेतकऱ्यांची कर्जमाफी व विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 शेतकऱ्यांची कर्जमाफी व विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


जालना: शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवला. मुख्य मागण्यांमध्ये कर्जमाफी आणि पीकविम्याची अग्रिम रक्कम लवकरात लवकर देणं, याचाही समावेश आहे.

संघटनेनं दावा केला आहे की, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान सरकारकडून मंजूर झालं असलं, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर ते वर्ग झालेलं नाही. त्यामुळे हे अनुदान तातडीनं खात्यात वर्ग करावं, अशी मागणी जोर धरत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितलं की, “शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत आहे. कर्जाच्या बोजाखाली असलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारनं तातडीनं कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.”

तसेच, आंदोलनकर्त्यांनी पीकविम्याची रक्कम लवकरात लवकर वितरित करण्याचीही मागणी केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या अडचणींना तोंड देण्यासाठी थोडा दिलासा मिळेल.

आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या असून, त्यावर सरकार काय पावलं उचलतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या