Posts

Showing posts from May, 2025

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

इनोव्हा-ट्रक भीषण अपघात : एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

Image
  अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        धुळे-सोलापूर महामार्गावर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. सौंदलगाव पाटीजवळ इनोव्हा आणि ट्रकच्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज १ जून रोजी सकाळीच्या सुमारास घडली.     मिळालेल्या माहितीनुसार हैद्राबादहून शिर्डीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या इरटीगा कार क्रमांक एपी ११ एटी ०४५५ या वाहनाच्या चालकाला अचानक डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे ३२ जीई ०२९१ ला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पी. रमेश पी. कृष्णामूर्ती (वय ४५, रा. मदनपेठ, मलकपेठ, हैद्राबाद) यांचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीराम दहीता (वय २५, रा. हैद्राबाद) हा युवक जखमी झाला आहे.     अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मृत व्यक्तीला वाचवण्यासाठी महामार्ग आपत्कालीन सेवा १०३३ ची रुग्णवाहिका व मदतनीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा व कारच्या अडकलेल्या भागांना लोखंडी पहार व टांबीच्या सहाय्याने ...

जालना व अंबड येथे दोन सरकारी अधिकारी लाचेच्या जाळ्यात

Image
  जालना व अंबडमध्ये भ्रष्टाचाराविरोधात एसीबीची धडक ! दोन वेगवेगळ्या प्रकरणांत सरकारी अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      राज्यातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला मोठे यश! जालना व अंबड तालुक्यातील दोन प्रकरणांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकांनी यशस्वी सापळा कारवाई करत दोन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारी लोकसेवकांना रंगेहात अटक केली आहे. या कारवायांनी जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रकरण 1: ग्रामविकास अधिकाऱ्याची १५,००० रुपयांची लाच घेताना अटक – ACB युनिट जालना     अंबड तालुक्यातील कुक्कुडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विष्णु शामराव भानुशे (वय 57) यांना ₹15,000/- लाच घेताना 31 मे 2025 रोजी ACB जालना पथकाने रंगेहात अटक केली.     तक्रारदाराने आपल्या आईच्या नावावरील मोकळ्या जमिनीची नोंद घेऊन 8अ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी अधिकारी भानुशे यांनी 29 मे रोजी ₹15,000/- लाचेची मागणी केली.    तक्रारदाराने लगेचच 30 मे रोजी ACB कडे लेखी तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान...

गोदावरी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; गावात शोककळा

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        गोदावरी नदीत शनिवारी सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर बाबासाहेब खराद (वय २० वर्षं रा. डोमलगाव, ता. अंबड) असे मृत तरुणाचे नाव आहे.     मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी डोमलगाव येथील दोन तरुण गोदावरी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहणं झाल्यानंतर त्यापैकी एक तरुण बाहेर आला, मात्र दुसरा तरुण पोहत असताना अचानक पाण्यात बुडाला. काही क्षणांतच तो नजरेआड झाला.     घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी गोदावरी नदीकाठ गाठला. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी गावातील पोहणारे युवक व मासेमारी करणारे नागरिक गोदावरी नदी पात्रात उतरले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला.    ज्ञानेश्वरच्या मृत्यूने खराद कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण डोमलगाव गावात शोककळा पसरली आहे. ही घटना सर्वांसाठीच हादरवून टाकणारी ठरली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील का...

जालन्यात खताचा २० लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त

Image
  जालना कृषी विभागाची मोठी कारवाई: चंदनझीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात कृषी विभागाने मोठी कारवाई करत उत्पादनास बंदी असलेल्या फॉस्फोजप्सिम या खताचा तब्बल २० लाख रुपये किमतीचा ३२० मेट्रिक टन साठा जप्त केला आहे. ही धडक कारवाई २८ मे बुधवार रोजी करण्यात आली असून, त्यामुळे कृषी व खत क्षेत्रात खळबळ उडाली आहे.        सदरील कारवाई कृष्णा फास्केईम लिमिटेड या कंपनीच्या जालना-राजूर मार्गावरील गुंडेवाडी शिवारात भाड्याने घेतलेल्या दोन गोदामांवर करण्यात आली. रेल्वे रॅकद्वारे जालना जिल्ह्यात येणाऱ्या खतांची कृषी विभागाकडून नियमित तपासणी केली जाते. त्याच दरम्यान, काही गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने या गोदामांवर छापा टाकला असता बंदी असलेल्या फॉस्फोजप्सिम खताचा मोठा साठा आढळून आला.      ऑक्टोबर २०२४ नंतर शासनाने फॉस्फोजप्सिम या खताच्या उत्पादन व वापरावर बंदी घातली असूनही संबंधित कंपनीकडून बेकायदेशीररित्या साठवणूक केली जात होती. जप्त करण्यात आलेला साठा सील कर...

बीड - अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून

Image
सात आरोपी ताब्यात, एक फरार वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका २७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला अशी माहिती मिळाली असून त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे करीत आहेत. घटनेचा तपशील     पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील भाटुंबा येथील रहिवासी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे (वय २७) आणि त्याचा मित्र सचिन करपे यांना २६ मे २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता सावळेश्वर (ता. केज) येथे अडवण्यात आले. रोहन मरके, सोन्या मस्के (रा. सावळेश्वर) व लाडेगाव येथील चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून रोहन मस्के यांच्या मामाच्या शेतात घेऊन गेले.    तेथे ज्ञानेश्वर धपाटे याला झाडाला बांधून लाकडी काठी व बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आली. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला पावनधामजव...

अबब तब्बल ४१ लाखाची मागितली लाच:२३ लाख घेतले ५ लाख घेतांना उपजिल्हाधिकारी व महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

Image
शेतजमिनीच्या कामासाठी ४१ लाखांची लाच मागणी,२३ लाख घेतले व ५ लाख घेताना निवासी उपजिल्हाधिकारी आणि महसूल सहाय्यक यांना रंगेहात पकडले वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या पथकाने आज सापळा रचून रंगेहात अटक केली. दोघांनी मिळून शेतजमिनीच्या वर्गवारी बदलाच्या कामासाठी तब्बल ४१ लाख रुपयांची लाच मागितल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यातील २३ लाख आधीच स्वीकारले असून, आज ५ लाख रुपये घेताना ते एसीबीच्या जाळ्यात अडकले तक्रारदाराची कहाणी     तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी 2023 मध्ये मौजे तिसगाव (गट नं. 225/5) येथील 6 एकर 16 गुंठे जमीन, जी वर्ग 2 मधील होती, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केली होती. ही जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक असलेले शासनाच्या चलन जनरेशनचे काम करण्यासाठी आरोपींनी लाच मागणी केली होती. मागणीची रक्कम आणि सापळा कारवाई    तक्रारदाराकडून आधीच 23 लाख रुपये ...

धक्कादायक! महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

Image
  ऊसाला खत देत असताना शेतातच झाला जीवघेणा अपघात वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकरी बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हादरवून टाकणारी घटना आज समोर आली आहे. ऊसाच्या शेतात खत देत असताना विद्युत तारेचा जबरदस्त शॉक लागल्याने वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.ही हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मारफळा गावात घडलीय. शेतातील लोंबकळत्या विद्युत तारांचे बळी    मिळालेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेले अभिमान कबले (वय ५०) आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कबले (वय २३) हे सकाळच्या सुमारास आपल्या शेतात खत देण्याचे काम करत होते. याच वेळी त्यांच्या शेतात विद्युत तारा जमिनीवर पडलेली होती, ज्यामध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. त्या तारेला स्पर्श झाल्याने दोघांनाही जोरदार शॉक बसला आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. रुग्णालयात नेत असतानाच अखेरचा श्वास     ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने दोघांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्...

भीषण अपघातात सहा तरुण ठार:माणुसकी दाखवत मदतीस धावलेल्या तरुणावर काळाचा घाला

Image
अपघातग्रस्त वाहन उचलताना काळाने घेतला विडा; मदत करणाऱ्या सहा जणांचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      अत्यंत दुर्दैवी व हृदय हे लावून टाकणारी घटना बीड जिल्ह्यातून समोर येत आहे.  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात माणुसकी दाखवत मदतीस धावलेल्या सहा तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास गढी गावाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. बीडवरून गेवराईकडे जाणारी जीप रस्त्याच्या बाजूला उलटली होती. स्थानिक तरुणांनी क्रेनच्या मदतीने ती बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची भीषणता काळजाचा ठोका चुकवणारी      मिळालेल्या माहितीनुसार सदर जीप पावसात रस्त्यावरील नियंत्रण सुटल्याने गडगडत खाली गेली. ही घटना पाहून गेवराईकडे जाणारे काही तरुण तातडीने मदतीस धावले. त्यांनी क्रेन बोलावून जीप बाजूला घेतली जात असताना अचानक भरधाव कंटेनरने धडक दिली. मदतीला धावलेले हे तरुण कंटेनरखाली चिरडले गेले. धडकेनंतर कंटेनर घटनास्थळावर...

माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघातात मृत्यू –वाहनाचा चक्काचूर

Image
  बीड जिल्ह्यात शोककळा वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण       बीड जिल्ह्याच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आर. टी. देशमुख यांचा सोमवारी दुपारी तुळजापूर - लातूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.   प्राप्त माहितीनुसार, पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचल्याने गाडी स्लिप झाली आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये आर. टी. देशमुख यांना जबर मार लागून जागीच गंभीर जखम झाली आणि पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी गाडीत त्यांच्यासोबत असलेले चालक आणि अंगरक्षक हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.   ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी असून, बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळासह सर्वत्र शोककळा पसरली आहे. आर. टी. देशमुख ह...

जालन्यात मोती तलावात दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू

Image
  दोघेही आईच्या समोरच तलावात उतरले, मात्र काही क्षणातच दोघांचाही बुडून मृत्यू झाला वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना शहरातून एक दुर्दैवी व हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज सोमवार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.       मृत्यूमुखी पडलेले दोघे भाऊ जुनेद असेफ सय्यद (वय १८) आणि आयान आसिफ सय्यद (वय १५) हे शेर सवार नगर, जुना जालना येथील रहिवासी होते. हे दोघे भावंडे आपल्या मामासह आणि इतर नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. पोहण्याचा मोह आवरता न आल्याने दोघेही आईच्या समोरच तलावात उतरले, मात्र काही क्षणातच दोघांचाही बुडून मृत्यू झाला.    घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू केली. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण...

भीषण अपघात : मालवाहतूक ट्रकने २० फूट फरफटत नेलेल्या महिलेचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

Image
  खूपच दुर्दैवी व हृदयद्रावक घटना  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    आज २५ मे रविवारी रोजी एका हृदयद्रावक व दुर्दैवी अपघातात मालवाहतूक ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पत्नी करिष्मा आयास सय्यद (वय २४, रा. मुर्शदपूर, आष्टी) यांचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. पती आयास सय्यद (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही      ही दुर्दैवी घटना आज आष्टी शहरातील सावळेश्वर ट्रॅक्टर्ससमोर घडली. दुचाकी क्रमांक MH 20 BD 5701 वरून आयास सय्यद व पत्नी करिष्मा हे अहिल्यानगरच्या दिशेने जात असताना त्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या मालवाहतूक ट्रक क्रमांक KA 39 6570 ने जोरदार धडक दिली. धडकेनंतर करिष्मा सय्यद ट्रकच्या चाकाखाली आल्या आणि तब्बल २० फूट अंतरावर फरफटत नेल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली. या भीषण प्रसंगात पती आयास सय्यद हे देखील जखमी झाले.     घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मदतकार्...

IMD चा यलो अलर्ट: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस

Image
  प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना: पूर्वसूचना असूनही नुकसानीचा धोका वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     आज २५ मे रविवार दुपारी IMD मुंबईने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशी माहिती हाती येतेय यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे. अशी माहिती मिळाली.      या अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नदी काठावर वसलेल्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे पूरपरिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे गावकऱ्यांना आवश्यकता भासल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश      प्रशासनाकडून संबंधित आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना पूर्ण सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले असून, वादळी वारा, पाऊस, विजेचा कडकडाट यामुळे कोणतीही हानी झाल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालया...

सर्पदंशाने घेतले दोन निष्पाप जीवांचे बळी: सख्या भावंडांचा मध्यरात्री मृत्यू

Image
  अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      २४ मे रोजी मध्यरात्री घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावाला हादरवून टाकले आहे. एका कुटुंबातील दोन निष्पाप चिमुकल्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला असून, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.     बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कोयाळ गावात २४ मेच्या मध्यरात्री घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली आहे. प्रदीप मधुकर मुंडे यांच्या घरात झोपेत असलेल्या त्यांच्या सख्या मुलगा व मुलीचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.    सात वर्षांची कोमल आणि पाच वर्षांचा शिवम हे रात्री साधारणतः १२ ते १ वाजेच्या दरम्यान झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप चढून गेला आणि त्याने दोघांनाही दंश केला. काही वेळातच दोघांची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तातडीने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.     या घटनेने मुंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे....

जालना - बीड महामार्गावर भीषण अपघात मायलेकीचा जागीच मृत्यू ८ जण जखमी

Image
ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची समोरासमोर धडक; मायलेकीचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर, ६ किरकोळ जखमी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. बीडवरून जालन्याकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना घडली. या अपघातात मायलेकींचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सहाजणांना किरकोळ जखमी झालेत.     हा अपघात मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास जालना - बीड महामार्गावर सुखापुरी फाट्यावर घडला. ट्रॅव्हल्स आणि टेम्पोमधील प्रवाशांची संख्या पाहता अधिक मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, परंतु तत्काळ मदतीमुळे काही जणांचे प्राण वाचले. जखमींवर अंबड आणि जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.      मिळालेल्या माहितीनुसार मृत मायलेकींची नावे अंजना पुरुषोत्तम सापनर (वय ३०) आणि अनुसया पुरुषोत्तम सापनर (वय १३) अशी असून त्या दोघी धानोरा, ता. शेणगाव, जि. हिंगोली येथील रहिवासी आहेत. या अपघातात पुरुषोत्तम नाथरा...

वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अंधाराचे साम्राज्य; महावितरणच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त

Image
  दरवर्षीच पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामे मग झाडे वर्षातच एवढी वाढतात तरी कशी ? वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    मे महिन्याच्या प्रखर उकाड्यात एकीकडे उष्णतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांना दुसरीकडे सततच्या विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे वारंवार विजेचा फॉल्ट होत असून, महावितरणकडून वेळेवर देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. परिणामी, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप पसरला आहे.दरम्यान दरवर्षीच पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामे मग झाडे वर्षातच एवढी वाढतात कशी असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सतत विजेचा खोळंबा, नागरिक त्रस्त      घनसावंगी तालुक्यातील अनेक गावे सध्या वारंवार होणाऱ्या विजेच्या खंडनामुळे अंधारात बुडाली आहेत. रात्रीच्या वेळेस १३२ केव्ही उपकेंद्रातून होणारा पुरवठा वारंवार ट्रिप होत आहे. झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर आदळल्याने, लोंबकळत्या वायर आणि फुटलेल्या इन्सुलेटरमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होतो आहे. पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाहीत, पिण्याच्या पाण...

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार आवश्यक दाखले! जालना जिल्ह्यात "दाखला आपल्या दारी" उपक्रम

Image
जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (सामान्य प्रशासन विभाग) यांच्या वतीने "दाखला आपल्या दारी" हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २६ मे २०२५ ते १० जून २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.     महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेली विविध प्रमाणपत्रे – जसे वय, जात, उत्पन्न, अधिवास, रहिवास इत्यादी – शाळेच्या ठिकाणीच व विहित वेळेत प्रदान करणे हा आहे. उपक्रमाची अंमलबजावणी खालील टप्प्यांमध्ये होणार १. शिबीरांचे आयोजन (२६ मे – २७ मे)     संबंधित शाळांमध्ये शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे गोळा केली जातील. शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी व आपले सरकार...

बीडमध्ये गोळीबार एक ठार ! पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत

Image
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर शुक्रवारी पहाटे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. चोरीच्या उद्देशाने प्रकल्पात घुसलेल्या चोरट्यांवर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. या गोळीबारात एक चोरटा जागीच ठार झाला असून इतर चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ही घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ मे शुक्रवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांचा मध्यरात्री प्रवेश, सुरक्षारक्षकांनी घेतली तत्काळ कृती     प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे दोनच्या सुमारास काही अज्ञात चोरटे पवनचक्की प्रकल्पात चोरीच्या उद्देशाने शिरले. तेव्हा तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या हे लक्षात आले. चोरट्यांना रोखण्याच्या प्रयत्नात त्याने गोळीबार केला. गोळी लागल्यामुळे एक चोरटा जागीच ठार झाला. इतर चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले. पोलिसांची तात्काळ कारवाई, तपास सुरु     गोळीबाराची माहिती मिळता...

शेतकऱ्यांनो सावधान! डांबरी रस्त्यांची खोदकामे करताना शेतकऱ्यांनी परवानगी घेणे अनिवार्य नसता भरावा लागेल दंड

Image
  ग्रामसडक योजनेंतर्गत कडक कारवाईचा इशारा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्त्यांची निगा राखण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जालना यांनी शेतकरी व नागरिकांना आवाहन केले आहे की, शेतीसाठी पाईपलाईन टाकणे, विहीर खोदणे, पाण्याच्या किंवा ड्रेनेज लाईनसाठी रोड क्रॉसिंग करण्यासाठी कोणतेही खोदकाम करताना संबंधित विभागाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.     बिनपरवानगी रस्त्यांचे नुकसान झाल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून नुकताच बाभूळगाव येथील सदाशिव त्र्यंबक राऊत यांनी भोकरदन – इजिमा – बाभूळगाव – कोदोली रस्त्यावर नाहरकत न घेता व कार्यालयास कोणतीही पूर्वसूचना न देता डांबरी पृष्ठभाग आणि मुरूम बाजूपट्या खोदल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी कार्यालयाने खालीलप्रमाणे दंड आकारणी केली आहे: डांबरी रस्ता खोदकाम (3.75 मीटर): प्रती मीटर ₹5500 प्रमाणे एकूण ₹20,625 मुरूम बाजूपट्या खोदकाम (3.00 मीटर): प्रती मीटर ₹1150 प्रमाणे एकूण ₹3450 एकूण रक्...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या