Posts

Showing posts from May, 2025

पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर: पाकिस्तानच्या 'स्वप्नातील हल्ल्याला' ठोस उत्तर! फोटोंसह

Image
  अदमपूर, पंजाब आजच्या विशेष दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसला दिली हजेरी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      ज्या आदमपूर एअरबेसवर पाकिस्तानने आपल्या सोशल मिडियावर 'स्वप्नात' हल्ला केल्याची खोटी बातमी मोठ्या जोमाने पसरवली होती, त्या ठिकाणी आज प्रत्यक्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १३ मे मंगळवार रोजी हजेरी लावून वस्तुस्थिती समोर आणली.     पंतप्रधान मोदींनी केवळ एअरबेसला भेट दिली नाही, तर भारतीय वायूदलाच्या जवानांमध्ये मिसळले, त्यांना सॅल्यूट केला आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गारही काढले. सैनिकांमध्ये जोश निर्माण करणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी अत्याधुनिक लढाऊ विमाने व संरक्षण उपकरणांची माहिती घेतली.      त्यांनी केवळ प्रत्यक्ष मैदानात जाऊन जवानांचे मनोबल वाढवले नाही, तर पाकिस्तानच्या दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया प्रोपगंडालाही प्रत्यक्ष कृतीने उत्तर दिलं.   पाकिस्तानच्या बनावट हल्ल्याच्या कल्पनेपेक्षा हजारपटीने वेगाने, मोदी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी तिथून रवाना झाले – शांत, ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण. ...

जालना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तरुणाचा दुर्दैवी प्रयत्न !

Image
  प्लॉटींगच्या वादातून पोलिसांवर खोट्या गुन्ह्याचा आरोप वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेवर गंभीर आरोप करत एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.      परमेश्वर कदम असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो जालना तालुक्यातील रेवगाव येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेवगावमध्ये प्लॉटच्या मालकीवरून परमेश्वर कदम यांचा गावातील एका व्यक्तीसोबत वाद सुरू आहे. या वादात समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरून पोलिसांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप परमेश्वर कदम याच्या नातवाइकांनी केला आहे.     पोलिसांनी विनाकारण गुन्हा दाखल करून मानसिक त्रास दिल्यामुळेच परमेश्वर कदम यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं नातवाइकांचे म्हणणे आहे. विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सम...

जालना - वीज अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Image
 "विजांचा कडकडाट, मेघगर्जना, आणि क्षणात घडलेला जीवघेणा अपघात..."  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना तालुक्यातील भाटेपुरी गावात आज (सोमवारी) दुपारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. वीज अंगावर पडल्याने विठ्ठल गंगाराम कावळे (वय २५) या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.      ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल आपल्या शेतात रोजच्या प्रमाणे कामात व्यग्र होते. दुपारनंतर अचानक आकाश काळं-कुट्ट झालं, वाऱ्याचा वेग वाढला आणि विजांचा गर्जना सुरू झाला. त्याच दरम्यान, एक प्रचंड वीज अंगावर पडली आणि क्षणात विठ्ठल जमिनीवर कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली आणि गंभीर अवस्थेत त्यांना तत्काळ जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.        तरुण वयातच विठ्ठल यांच्या अकाली जाण्याने भाटेपुरी गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबातील एकमेव आधारस्तंभ हरपल्याने आई-वडील, भावंडं व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकरीही अश्रू अनावर करून एकमेकांना धीर देतान...

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: दोनजण ठार तर पाच जखमी

Image
हैद्राबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      हैद्रा राबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या विना नंबर प्लेटच्या हायवाने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात परप्रांतीय दांपत्य जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, कारमधील मृतदेह व जखमींना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.   हैद्राबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. हैदराबाद येथील जी. रामू (वय ४४) आणि जी. माधुरी (वय ४०) हे दांपत्य या अपघातात जागीच ठार झाले. तर श्रीवाणी (वय ४०), अनुषा (वय १६), मेघना (वय १३), ऋषिका (वय ८) आणि नागेश्वर राव (वय ४४) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.     हैद्राबादहून  रविवारी दुपारी १२ व...

जालना जिल्ह्यात ड्रोन सदृश्य वस्तूंची हालचाल; नागरिकांना घाबरू नये-पोलीस विभागाचे आवाहन

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      आज ९ मे रोजी जालना जिल्ह्यात काही भागांमध्ये आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्याची नोंद झाली आहे. या संदर्भात नागरिकांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्पष्ट केले आहे की, या संदर्भात घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.   "या बाबतची माहिती संवेदनशील असल्याने यावर सविस्तर भाष्य करता येणार नाही. मात्र नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये," असेही त्यांनी सांगितले.     सदर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने संबंधित व्हिडिओ आणि घटनांची चौकशी सुरू केली आहे. कोणतीही अधिकृत माहिती येईपर्यंत अफवांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.     याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले, "सर्व माहितीची खातरजमा केली जात आहे. नागरिकांनी घाबरू नये आणि कोणत्याही असत्य माहितीवर विश्वास ठेवू नये."     जिल्हा ...

घनसावंगी तहसील कार्यालयात शेतरस्ते व पाणंद रस्त्यांच्या अतिक्रमणावर तडजोडीने निर्णय

Image
  तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - तहसीलदार योगिता खटावकर  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या परिपत्रकानुसार तहसील कार्यालय घनसावंगी येथे दिनांक ९ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत सस्ती अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीमध्ये शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढली जाणार आहेत. अशी माहिती घनसावंगी च्या तहसीलदार योगिता खटावकर यांनी दिली.      छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्याने सामान्य शेतकऱ्यांना तात्काळ व न्यायालयीन खर्च वाचवणारा न्याय मिळवून देण्यासाठी सस्ती अदालतींचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत तालुकास्तरावर खालील समिती कार्यरत असेल अध्यक्ष : तहसीलदार, सह-अध्यक्ष : गट विकास अधिकारी,सदस्य : उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपअभियंता (बांधकाम विभाग), वनपरिक्षेत्र अधिकारी (आवश्यकतेनुसार), पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, सचिव : नायब तहसीलदार (म...

अंबड तहसीलदारांची मोठी कारवाई- ३१ वाळू तस्करांवर गुन्हे दाखल, १ कोटींचा महसूल बुडवला

Image
  वाळकेश्वर व शहागड परिसरात महसूल विभागाची धाड: ट्रॅक्टरसह वाहने व मोबाईल जप्त वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     अंबड तालुक्यातील शहागड परिसरातील गोदावरी नदीपात्रातून अंदाजे २०० ब्रास वाळू चोरी गेल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने ३१ वाळू तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करत भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ व १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या वाळू चोऱ्येमुळे शासनाचा सुमारे १ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे उघड झाले आहे.    २९ एप्रिल रोजी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी शहागड व आपेगाव यांनी गावातील पंचांनामा घेऊन गोदावरी नदीपात्राची पाहणी करून पंचनामा केला. पाहणी दरम्यान जुन्या पुलाजवळ, महादेव मंदिराजवळ आणि समर्थ कारखान्याच्या पाणीपुरवठा ठिकाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उत्खनन केल्याचे निदर्शनास आले.     २४ एप्रिलपासून नदीपात्रात संचारबंदी लागू असूनही रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, लोडर व हायवा ट्रकच्या साहाय्याने वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळले....

जालना-पोहायला गेलेल्या दोन बालकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       नदीकाठी खेळात असताना पोहायला गेलेल्या दोन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यात घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.      जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा बुद्रुक परिसरात गुरुवारी दुपारी पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत बालकांची नावे उमेश दादाराव कासारे (वय १०) आणि प्रेम ज्ञानेश्वर घोरपडे (वय ८) अशी आहेत.    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमेश आणि प्रेम हे दुपारच्या सुमारास गावाजवळील पूर्णा नदीकाठी खेळत होते. खेळता खेळता ते दोघे नदीत पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. परिसरातील काही ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.    या दुर्दैवी घटनेने निमखेडा बुद्रुक गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या क...

ऑपरेशन सिंदूर: भारताच्या दोन रणरागिणींचा दहशतवादाविरोधात ऐतिहासिक विजय

Image
  कोण आहेत ऑपरेशन सिंदुर ची माहिती देणाऱ्या रणरागिणी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग विशेष रिपोर्ट वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      ७  मे २०२५ रोजी जगभरात एक अभिमानास्पद क्षण घडला -जेव्हा भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि परिणामकारक हल्ला केला. 'ऑपरेशन सिंदूर' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मिशनची माहिती जगापुढे आणली ती दोन शूर महिला अधिकारी - कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी !     हा केवळ एक हल्ला नव्हता, तर भारतीय स्त्रीशक्तीची आणि धर्मनिरपेक्षतेची भव्य आणि जगाला थक्क करणारी घोषणा होती. 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल थोडक्यात:     २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या महत्त्वाच्या केंद्रांवर निशाणा साधण्यात आला. सकाळी १:०५ ते १:३० दरम्यान झालेल्या हवाई आणि सर्जिकल स्ट्राईकम...

ऑपरेशन सिंदूर: भारताचा दहशतवाद्यांवर जोरदार प्रहार; पाकिस्तान आणि पीओकेतील ९ ठिकाणी हवाई हल्ले पहा बातमी व छायाचित्रे

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      ७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात हवाई कारवाई केली. भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत एकाच वेळी नऊ ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत दहशतवादी नेते हाफिज सईद आणि मसूद अझहर यांच्या लपण्याच्या ठिकाणांचा समावेश आहे. हल्ल्याची ठिकाणे आणि परिणाम     मिळालेल्या माहितीनुसार, भारताने मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, कोटली, बाग, गुलपूर, भिंबर आणि शकरगढ येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर टार्गेटेड हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये कोणतेही पाकिस्तानी लष्करी आस्थापन लक्ष्य करण्यात आले नाही, हे विशेषतः स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र बहावलपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती आहे आणि ३० जणांच्या मृत्यूची पुष्टी होत आहे. बहावलपूरमध्ये मोठी हालचाल आणि इंटरनेट बंदीची शक्यता       हल्ल्यानंतर बहावलपूर येथील रुग्णालयांमध्ये अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्या...

७ तारखेला देशभरात मॉक ड्रिल; हवाई हल्ला अलर्टसाठी सायरन वाजणार

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       नवी दिल्ली: येत्या ७ तारखेला, बुधवारी संपूर्ण देशात एक मोठ्या प्रमाणावर मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत सर्व राज्य सरकारांना, सुरक्षायंत्रणांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या दिवशी देशभरात एकाचवेळी हवाई हल्ल्याचा अलर्ट देणारा सायरन वाजवण्यात येणार आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.    भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही दक्षता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली, तर नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका टाळण्यासाठी ही मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.     या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याची तयारी निर्माण करणे आणि स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे. या अंतर्गत शाळा, महाविद्यालये, कार्यालये, बाजारपेठा, रहिवासी भाग अशा विविध ठिकाणी लोकांना योग्य ती माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे.    गृहमंत्रालयाने नागरिकांन...

घनसावंगी तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर : युवक गंभीर जखमी

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        घनसावंगी तालुक्यात दि ५ मे सोमवारी दुपारनंतर अनेक गावात अचानक प्रचांड वादळी वारा झाला यात एक युवक गंभीर जखमी झाला त्याला जालन्याला हलवले आहे.    तालुक्यातील बाणेगाव येथे रविवारी दुपारी अचानक आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे कृष्णा उद्धव मस्के (रा. बाणेगाव) हा युवक गंभीर जखमी झाला. गावात जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जाहिरातीचे फलक उडाले. यातील एक फलक कृष्णा मस्के यांच्या डोक्यावर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी कृष्णा मस्के     या अपघातानंतर कृष्णा मस्के यांच्या कानातून रक्तस्राव सुरू झाला तसेच त्याला रक्ताची उलटीही झाली. गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जालना येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.    घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वादळी वाऱ्यामुळे इतरही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले आहे.

घनसावंगी-ग्रामस्थांनी चोरटे पकडले; संतप्त ग्रामस्थांनी स्विफ्ट कारची केली प्रचंड तोडफोड

Image
  घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील प्रकार, तीर्थपुरी पोलिसांवर निष्क्रियतेचे आरोप वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     चोरीसाठी आलेल्या चोरट्यांना गावकऱ्यांनी मोठ्या धैर्याने पकडले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चोरट्यांच्या स्विफ्ट कारची जोरदार तोडफोड केली. या घटनेने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिस प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदरील घटना घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे घडलीय.       सिद्धेश्वर पिंपळगाव येथील गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ ते ५ मेच्या रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास, स्विफ्ट कार (क्रमांक MH 48 P 0238) मधून पाच चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. कारमध्ये ड्रायव्हर थांबून राहिला, तर पाच जण गावात फीरत होते. सतर्क ग्रामस्थांच्या नजरेतून त्यांच्या हालचाली वाचल्या नाहीत. गावात 'चोर चोर' अशी आरडाओरड होताच चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.     ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये थांबलेल्या ड्रायव्हरला पकडले आणि चौकशी केली. चौकशीत तो खोटं बोलत असल्याचे उघड झाले. ...