अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

धक्कादायक! महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

 ऊसाला खत देत असताना शेतातच झाला जीवघेणा अपघात


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकरी बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हादरवून टाकणारी घटना आज समोर आली आहे. ऊसाच्या शेतात खत देत असताना विद्युत तारेचा जबरदस्त शॉक लागल्याने वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.ही हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मारफळा गावात घडलीय.


शेतातील लोंबकळत्या विद्युत तारांचे बळी

   मिळालेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेले अभिमान कबले (वय ५०) आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कबले (वय २३) हे सकाळच्या सुमारास आपल्या शेतात खत देण्याचे काम करत होते. याच वेळी त्यांच्या शेतात विद्युत तारा जमिनीवर पडलेली होती, ज्यामध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. त्या तारेला स्पर्श झाल्याने दोघांनाही जोरदार शॉक बसला आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली.


रुग्णालयात नेत असतानाच अखेरचा श्वास

    ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने दोघांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. एका कुटुंबातील दोन सदस्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.


महावितरणच्या दुर्लक्षामुळे घेतले प्राण

    या घटनेमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही शेतातील लोंबकळत्या व तुटलेल्या विद्युत तारा दुरुस्त केल्या जात नाहीत. यामुळे अपघाताची शक्यता वाढते आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.


गावकऱ्यांची संतप्त मागणी

   या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत, नुकसानभरपाई आणि सरकारी नोकरीची भरपाई द्यावी, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


सरकार आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे

    गावकऱ्यांनी प्रशासन आणि महावितरणला इशारा दिला आहे की, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शेतांतील विद्युत तारांची वेळोवेळी तपासणी आणि दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात आणखी निष्पाप जीव गमवावे लागतील.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या