घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मिळालेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेले अभिमान कबले (वय ५०) आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कबले (वय २३) हे सकाळच्या सुमारास आपल्या शेतात खत देण्याचे काम करत होते. याच वेळी त्यांच्या शेतात विद्युत तारा जमिनीवर पडलेली होती, ज्यामध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. त्या तारेला स्पर्श झाल्याने दोघांनाही जोरदार शॉक बसला आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली.
ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने दोघांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. एका कुटुंबातील दोन सदस्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही शेतातील लोंबकळत्या व तुटलेल्या विद्युत तारा दुरुस्त केल्या जात नाहीत. यामुळे अपघाताची शक्यता वाढते आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत, नुकसानभरपाई आणि सरकारी नोकरीची भरपाई द्यावी, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
गावकऱ्यांनी प्रशासन आणि महावितरणला इशारा दिला आहे की, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शेतांतील विद्युत तारांची वेळोवेळी तपासणी आणि दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात आणखी निष्पाप जीव गमवावे लागतील.
Comments
Post a Comment