अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

इनोव्हा-ट्रक भीषण अपघात : एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

 अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     धुळे-सोलापूर महामार्गावर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. सौंदलगाव पाटीजवळ इनोव्हा आणि ट्रकच्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज १ जून रोजी सकाळीच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार हैद्राबादहून शिर्डीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या इरटीगा कार क्रमांक एपी ११ एटी ०४५५ या वाहनाच्या चालकाला अचानक डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे ३२ जीई ०२९१ ला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पी. रमेश पी. कृष्णामूर्ती (वय ४५, रा. मदनपेठ, मलकपेठ, हैद्राबाद) यांचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीराम दहीता (वय २५, रा. हैद्राबाद) हा युवक जखमी झाला आहे.

    अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मृत व्यक्तीला वाचवण्यासाठी महामार्ग आपत्कालीन सेवा १०३३ ची रुग्णवाहिका व मदतनीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा व कारच्या अडकलेल्या भागांना लोखंडी पहार व टांबीच्या सहाय्याने तोडून मृतदेह व जखमी व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. मृतदेह वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.

     या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती. गोंदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

    धुळे-सोलापूर महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून, रस्त्यावर वाहतुकीचा वेग व चालकांची निष्काळजीपणा यामुळे अशा घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासन व वाहतूक पोलिसांनी या मार्गावर अधिक गस्त वाढवावी व ड्रायव्हरना वाहन चालवताना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या