घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

भीषण अपघात : मालवाहतूक ट्रकने २० फूट फरफटत नेलेल्या महिलेचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

 खूपच दुर्दैवी व हृदयद्रावक घटना 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  आज २५ मे रविवारी रोजी एका हृदयद्रावक व दुर्दैवी अपघातात मालवाहतूक ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पत्नी करिष्मा आयास सय्यद (वय २४, रा. मुर्शदपूर, आष्टी) यांचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. पती आयास सय्यद (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही

     ही दुर्दैवी घटना आज आष्टी शहरातील सावळेश्वर ट्रॅक्टर्ससमोर घडली. दुचाकी क्रमांक MH 20 BD 5701 वरून आयास सय्यद व पत्नी करिष्मा हे अहिल्यानगरच्या दिशेने जात असताना त्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या मालवाहतूक ट्रक क्रमांक KA 39 6570 ने जोरदार धडक दिली. धडकेनंतर करिष्मा सय्यद ट्रकच्या चाकाखाली आल्या आणि तब्बल २० फूट अंतरावर फरफटत नेल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली. या भीषण प्रसंगात पती आयास सय्यद हे देखील जखमी झाले.

    घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमी आयास सय्यद यांना आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला व नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

     या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून ती सुरळीत केली.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या