अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

भीषण अपघातात सहा तरुण ठार:माणुसकी दाखवत मदतीस धावलेल्या तरुणावर काळाचा घाला

अपघातग्रस्त वाहन उचलताना काळाने घेतला विडा; मदत करणाऱ्या सहा जणांचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   अत्यंत दुर्दैवी व हृदय हे लावून टाकणारी घटना बीड जिल्ह्यातून समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात माणुसकी दाखवत मदतीस धावलेल्या सहा तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास गढी गावाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. बीडवरून गेवराईकडे जाणारी जीप रस्त्याच्या बाजूला उलटली होती. स्थानिक तरुणांनी क्रेनच्या मदतीने ती बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.


अपघाताची भीषणता काळजाचा ठोका चुकवणारी

     मिळालेल्या माहितीनुसार सदर जीप पावसात रस्त्यावरील नियंत्रण सुटल्याने गडगडत खाली गेली. ही घटना पाहून गेवराईकडे जाणारे काही तरुण तातडीने मदतीस धावले. त्यांनी क्रेन बोलावून जीप बाजूला घेतली जात असताना अचानक भरधाव कंटेनरने धडक दिली. मदतीला धावलेले हे तरुण कंटेनरखाली चिरडले गेले. धडकेनंतर कंटेनर घटनास्थळावर न थांबता पुढे निघून गेला.


घटनास्थळी हंबरडा आणि संताप

    अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी धावले. जखमींना तत्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांचा हंबरडा फूटला. अनेकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला.


मृतांची नावे अशी

1. सचिन रमेश नन्नवरे (वय ३५, रा. संजयनगर, गेवराई)

2. बाळासाहेब ज्ञानोबा आतकरे (वय ३६, रा. सावतानगर, गेवराई)

3. दीपक राजपाल सुरय्या (वय ४२, रा. गढी)

4. कृष्णा जाधव (वय ३५, रा. संजयनगर, गेवराई)

5. भागवत गंगाधर परळकर (वय ३९, रा. रंगार चौक, गेवराई)

6. मनोज वैजिनाथ करांडे (वय ३९, रा. रांजणी)

जखमींची नावे

योगेश शिंदे (रा. खळेगाव) एक अन्य जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


वाहतूक कोंडी आणि पावसाचा अडथळा

  या अपघातामुळे बीड-गेवराई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच पावसाने उग्र रूप धारण केल्याने मदतकार्य अडचणीत आले.

    ही घटना केवळ अपघात नसून मदतीला धावलेल्या माणुसकीवरच काळाने घाला घातल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.


 

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या