घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मिळालेल्या माहितीनुसार सदर जीप पावसात रस्त्यावरील नियंत्रण सुटल्याने गडगडत खाली गेली. ही घटना पाहून गेवराईकडे जाणारे काही तरुण तातडीने मदतीस धावले. त्यांनी क्रेन बोलावून जीप बाजूला घेतली जात असताना अचानक भरधाव कंटेनरने धडक दिली. मदतीला धावलेले हे तरुण कंटेनरखाली चिरडले गेले. धडकेनंतर कंटेनर घटनास्थळावर न थांबता पुढे निघून गेला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी धावले. जखमींना तत्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांचा हंबरडा फूटला. अनेकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला.
1. सचिन रमेश नन्नवरे (वय ३५, रा. संजयनगर, गेवराई)
2. बाळासाहेब ज्ञानोबा आतकरे (वय ३६, रा. सावतानगर, गेवराई)
3. दीपक राजपाल सुरय्या (वय ४२, रा. गढी)
4. कृष्णा जाधव (वय ३५, रा. संजयनगर, गेवराई)
5. भागवत गंगाधर परळकर (वय ३९, रा. रंगार चौक, गेवराई)
6. मनोज वैजिनाथ करांडे (वय ३९, रा. रांजणी)
योगेश शिंदे (रा. खळेगाव) एक अन्य जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे बीड-गेवराई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच पावसाने उग्र रूप धारण केल्याने मदतकार्य अडचणीत आले.
ही घटना केवळ अपघात नसून मदतीला धावलेल्या माणुसकीवरच काळाने घाला घातल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment