अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

सर्पदंशाने घेतले दोन निष्पाप जीवांचे बळी: सख्या भावंडांचा मध्यरात्री मृत्यू

 अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    २४ मे रोजी मध्यरात्री घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावाला हादरवून टाकले आहे. एका कुटुंबातील दोन निष्पाप चिमुकल्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला असून, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

    बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कोयाळ गावात २४ मेच्या मध्यरात्री घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली आहे. प्रदीप मधुकर मुंडे यांच्या घरात झोपेत असलेल्या त्यांच्या सख्या मुलगा व मुलीचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

   सात वर्षांची कोमल आणि पाच वर्षांचा शिवम हे रात्री साधारणतः १२ ते १ वाजेच्या दरम्यान झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप चढून गेला आणि त्याने दोघांनाही दंश केला. काही वेळातच दोघांची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तातडीने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

    या घटनेने मुंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. निष्पाप वयात दोन चिमुकल्यांचा असा अकाली मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या