घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

सर्पदंशाने घेतले दोन निष्पाप जीवांचे बळी: सख्या भावंडांचा मध्यरात्री मृत्यू

 अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    २४ मे रोजी मध्यरात्री घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावाला हादरवून टाकले आहे. एका कुटुंबातील दोन निष्पाप चिमुकल्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला असून, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

    बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कोयाळ गावात २४ मेच्या मध्यरात्री घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली आहे. प्रदीप मधुकर मुंडे यांच्या घरात झोपेत असलेल्या त्यांच्या सख्या मुलगा व मुलीचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

   सात वर्षांची कोमल आणि पाच वर्षांचा शिवम हे रात्री साधारणतः १२ ते १ वाजेच्या दरम्यान झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप चढून गेला आणि त्याने दोघांनाही दंश केला. काही वेळातच दोघांची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तातडीने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

    या घटनेने मुंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. निष्पाप वयात दोन चिमुकल्यांचा असा अकाली मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या