घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना - बीड महामार्गावर भीषण अपघात मायलेकीचा जागीच मृत्यू ८ जण जखमी

ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची समोरासमोर धडक; मायलेकीचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर, ६ किरकोळ जखमी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. बीडवरून जालन्याकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना घडली. या अपघातात मायलेकींचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सहाजणांना किरकोळ जखमी झालेत.

    हा अपघात मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास जालना - बीड महामार्गावर सुखापुरी फाट्यावर घडला. ट्रॅव्हल्स आणि टेम्पोमधील प्रवाशांची संख्या पाहता अधिक मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, परंतु तत्काळ मदतीमुळे काही जणांचे प्राण वाचले. जखमींवर अंबड आणि जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

     मिळालेल्या माहितीनुसार मृत मायलेकींची नावे अंजना पुरुषोत्तम सापनर (वय ३०) आणि अनुसया पुरुषोत्तम सापनर (वय १३) अशी असून त्या दोघी धानोरा, ता. शेणगाव, जि. हिंगोली येथील रहिवासी आहेत. या अपघातात पुरुषोत्तम नाथराव सापनर आणि कृष्णा पुरुषोत्तम सापनर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यांना अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

    तसेच, बाळू शेळके , सतीश लव्हटे (रा. तळेगाव ता. भोकरदन), विजय नेहारकर (रा. परळी), संदीप उमाजी शेप आणि यश फुलारे (रा. शेपवाडी) हे किरकोळ जखमी झालेत.

    या दुर्घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य हाती घेतले. अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी अंधार, वेग आणि चुकीच्या दिशेने वाहनचालना मुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

    या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने अपघाताबाबत चौकशी सुरू केली असून पुढील कारवाई सुरू आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या