अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

गोदावरी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; गावात शोककळा

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     गोदावरी नदीत शनिवारी सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर बाबासाहेब खराद (वय २० वर्षं रा. डोमलगाव, ता. अंबड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी डोमलगाव येथील दोन तरुण गोदावरी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहणं झाल्यानंतर त्यापैकी एक तरुण बाहेर आला, मात्र दुसरा तरुण पोहत असताना अचानक पाण्यात बुडाला. काही क्षणांतच तो नजरेआड झाला.

    घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी गोदावरी नदीकाठ गाठला. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी गावातील पोहणारे युवक व मासेमारी करणारे नागरिक गोदावरी नदी पात्रात उतरले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला.

   ज्ञानेश्वरच्या मृत्यूने खराद कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण डोमलगाव गावात शोककळा पसरली आहे. ही घटना सर्वांसाठीच हादरवून टाकणारी ठरली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. 

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या