अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यात मोती तलावात दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू

 दोघेही आईच्या समोरच तलावात उतरले, मात्र काही क्षणातच दोघांचाही बुडून मृत्यू झाला


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना शहरातून एक दुर्दैवी व हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज सोमवार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

      मृत्यूमुखी पडलेले दोघे भाऊ जुनेद असेफ सय्यद (वय १८) आणि आयान आसिफ सय्यद (वय १५) हे शेर सवार नगर, जुना जालना येथील रहिवासी होते. हे दोघे भावंडे आपल्या मामासह आणि इतर नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. पोहण्याचा मोह आवरता न आल्याने दोघेही आईच्या समोरच तलावात उतरले, मात्र काही क्षणातच दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

   घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू केली. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

   मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्या घरी अवघ्या चार दिवसांनी त्यांच्या बहिणीचे लग्न होणार होते. घरात चाललेली लगबग क्षणात थांबली आणि आनंदमय वातावरणात दुःखाचे काळे ढग दाटून आले. मृत्यूच्या बातमीने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोती तलाव परिसरात हजारो नागरिकांची गर्दी जमली होती.

    चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवले आहेत. पुढील तपास चंदनझीरा पोलीस करीत आहेत.

     हा अपघात केवळ दुःखदच नाही, तर सतर्कतेचा इशाराही देणारा आहे. अशा जलाशयांमध्ये सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित करणारी ही घटना आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या