Posts

Showing posts from April, 2025

शेतीपिक नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य:शासनाने जारी केले परिपत्रक

Image
अॅग्रिस्टॅक योजनेशी एकत्रिकरणाची प्रक्रिया १५ जुलैपासून लागू वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिक नुकसानीच्या मदतीसाठी आता कृषी विभागाच्या ‘अॅग्रिस्टॅक’ योजनेत नोंदणी करून मिळालेला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २९ एप्रिल २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे. १५ जुलै २०२५ पासून नवीन नियम अंमलात येणार     या नव्या प्रक्रियेनुसार, १५ जुलै २०२५ पासून मदत व पुनर्वसन विभागाच्या नैसर्गिक आपत्ती मदत योजनेतून शेतीपिक व शेतजमिन नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा 'फार्मर आयडी' असणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने अॅग्रिस्टॅक योजनेत आपली नोंदणी करून आपला आयडी मिळवणे आवश्यक ठरणार आहे. पंचनाम्यात ‘फार्मर आयडी’साठी स्वतंत्र रकाना     शेतीपिक नुकसान पंचनामे करताना आता शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी (फार्मर आयडी) स्वतंत्र रकाना ठेवण्यात येणार आहे. पंचनामे पारंपरिक पद्धतीने केले जात असले तरी, या नव्या रकान्यात संबंधित शेत...

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सेल्फ सर्वेक्षणासाठी मुदतवाढ

Image
नागरिकांनी १५ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावा सर्वेक्षण वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत सुरू असलेल्या 'आवास+ 2024' घरगुती सर्वेक्षणासाठी मुदत वाढविली आहे. याअंतर्गत सर्व पात्र ग्रामीण कुटुंबांची ओळख पटवण्यासाठी सेल्फ सर्वेक्षणाची अंतिम तारीख आता १५ मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.      मंत्रालयाने याआधी २८ मार्च २०२५ रोजी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, राज्यांकडून आलेल्या विनंत्यांचा विचार करून ग्रामीण विकास विभागाने आणखी १५ दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे.    सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे की, या वाढीव मुदतीदरम्यान सर्व पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करावे. यासाठी 'आवास+ 2024' मोबाईल अॅप्लिकेशन चा वापर करून स्वयं-सर्वेक्षण प्रक्रिया राबवावी आणि त्याची योग्य ती पडताळणी करावी.      ग्रामीण विकास विभागा...

अंबड - घनसावंगी तालुक्यात टँकरमुक्तीसाठी महत्त्वाचा टप्पा: जलसंधारण कार्याला गती; १५.२०लाखांचा एकूण लोकसहभातून होताहेत कामे

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      अंबड - घनसावंगी तालुक्याला कायमस्वरूपी पाणीदार करून टँकरमुक्त करण्याचा संकल्प समस्त महाजन ट्रस्ट, मुंबईच्या नूतन दीदींनी हाती घेतला असून, या सामाजिक उपक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.   ग्रामीण भागातील सामान्य जनतेला स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे व शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याचा आधार मिळावा, यासाठी ग्रामस्तरीय बैठका घेऊन जलसंधारणाविषयी जागृती करण्यात आली.यासाठी आत्तापर्यंत लोकसहभाग डिझेल खर्च व ट्रस्टचा मशीन खर्च मिळून जवळपास पंधरा लाख वीस हजार रुपये लोकसहभाग कामे होत आहेत. अशी माहिती समाज सेवक देवानंद चित्राल यांनी दिली.      या उपक्रमांतर्गत ट्रस्टच्या मोफत पोकलेन्ड मशिनद्वारे नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण, तसेच तळ्यातील गाळ मोफत स्वरूपात शेतकऱ्यांच्या वाहनांमध्ये भरून देण्यात आला. गाळ वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. दि. १६ एप्रिल पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून, गाव पातळीवर जल समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाच...

लेका पाठोपाठ आईने विष प्राशन करून संपवले जीवन; दुहेरी शोकांतिका

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    आपल्या मुलाने फाशी घेऊन जीवन संपवले ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मनाला लाऊन घेऊन त्याच्या आईनेही काही तासातच आपले जीवन संपवल्याची खूपच दुर्दैवी घटना समोर आलीय.    बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला या छोट्याशा गावात हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईनेही दुःखाचा भार सहन न होऊन आपले जीवन संपवले. ही दुहेरी आत्महत्या गावासाठी मोठा आघात ठरली असून, परिसरात शोककळा पसरली आहे. अभिमान खेत्रे याने फाशी घेऊन संपवले जीवन    अभिमान भागुजी खेत्रे (वय ३५) या तरुणाने दिनांक २८ एप्रिल रोजी दुपारी घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच घरातील सदस्य आणि गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न होऊन आईने घेतला टोकाचा निर्णय    अभिमानच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या आई, कौशल्या भागुजी खेत्रे (वय ७०) या पूर्ण...

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पीकविमा योजना, पहलगाम हल्ल्यातील मदत, ईव्ही धोरणासह ११ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक २९ एप्रिल मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, आदिवासी समाज, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अशी माहिती मिळाली. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना ५० लाखांची मदत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. पीकविमा योजनेत बदल – बोगस अर्जांवर कारवाई, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुधारणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, एक रुपयात सुरू असलेल्या पीकविमा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व बोगस अर्ज आले होते. त्यामुळे गरजू शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून सुधारित योजना आणली जाणार आहे. नवीन योजनेत विमा कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष फायदा होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ईव्ही धोरण...

घनसावंगी- पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू; दुसऱ्या दिवशी सापडले प्रेत

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जायकवाडी पैठण डाव्या कालव्याच्या गेट क्रमांक ९१ सीआरजवळ दि २६ एप्रिल शनिवारी सकाळी मुलाला पोहायला शिकवण्यासाठी गेलेले शकील मजीद कुरेशी (वय ४०) पाण्यात उडी मारल्यानंतर बेपत्ता झाले होते. रविवारी दि २७ एप्रिल रोजी सकाळी हादगाव शिवारात कालव्यात त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.     शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शकील कुरेशी आपल्या दहा वर्षाच्या मुलाला पोहायला शिकवण्यासाठी कालव्याजवळ गेले होते. त्यांनी मुलाला काठावर बसवले आणि स्वतः गेटजवळ उडी मारली. मात्र गेटजवळ पाणी खवळलेले असल्याने त्यांना वर येता आले नाही आणि ते पाण्यात बुडून बेपत्ता झाले.      घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच कुंभार पिंपळगाव ते हादगाव, आष्टी, लोणीपर्यंत अनेक पोहणाऱ्यांनी शोध मोहीम राबवली. जालना व घनसावंगी येथून अग्नीशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. बोटीच्या साहाय्याने व बॅटऱ्यांच्या प्रकाशात रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते.      परंतु, शनिवारी दिवसभर व रात्रीच्या प्रय...

जालना - खून करणाऱ्या आरोपीस दोन तासांत अटक; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कार्यवाही

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने केवळ दोन तासांत आरोपीस अटक करून अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जलद कार्यवाही केली .    दिनांक २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास, नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे (रा. कन्हैया नगर, जालना) या इसमाचा देऊळगावराजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत, जामवाडी शिवारात अज्ञात इसमाने खून केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक जालना यांनी पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.     पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला असता, आरोपी संदीप ज्ञानेश्वर राऊत (रा. कन्हैया नगर, जालना) हा जामवाडी येथे असल्याचे समजले. त्वरित कारवाई करत पोलीस पथकाने आरोपीस ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.     चौकशीतून उघड झाले की, मयत नरेश उर्फ बंटी यान...

तीर्थपुरीत उद्या बंद; पहेलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      काश्मीरमधील पहेलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, व्यापारी महासंघ तीर्थपुरी यांच्या वतीने उद्या, दिनांक २७ एप्रिल रविवार रोजी तीर्थपुरीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज व्यापारी महासंघाने तीर्थपुरी पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.     निवेदनात म्हटले आहे की, पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी नागरिकांवर बेछूट गोळीबार करत भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्या निषेधार्थ आणि शहीद नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तीर्थपुरीतील व्यापारी उद्या आपली दुकाने व व्यवसाय बंद ठेवून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.    सर्व व्यापाऱ्यांना शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत. तसेच नागरिकांनी बंदच्या काळात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोदावरीतून अवैध वाळू उपसा करणारे सहा हायवा जप्त, साडेतीन कोटींचा मुद्देमाल ताब्यात

Image
  अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांची आपेगाव शिवारात मध्यरात्री धाड:  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      अंबड तालुक्यातील आपेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी मध्यरात्री अचानक धाड टाकली. या कारवाईत अवैध वाळू उपसासाठी वापरले जात असलेले तब्बल सहा हायवा ट्रक जप्त करण्यात आले असून, सुमारे ३.५ कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.      ही कारवाई २५ एप्रिलच्या मध्यरात्री करण्यात आली. तहसीलदार चव्हाण यांना गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच, काही ट्रकचालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे काही हायवा घटनास्थळीच पकडण्यात आल्या.     दरम्यान, या अवैध वाळू उपसाला स्थानिक प्रशासनातील काही व्यक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणात आपेगावचे सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावरही गोपनीय चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही प्र...

जालना शहरातील तरुणाचा खून ! जामवाडी शिवारात पेट्रोल पंपाजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     जालना तालुक्यातील जामवाडी शिवारात देऊळगाव राजा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कन्हैयानगर भागातील बंटी नारायण राजवे (वय ३०) असे करण्यात आली आहे.     या घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. मृतदेहाच्या डोक्यावर व अंगावर गंभीर मारहाणीच्या खुणा व रक्ताचे डाग दिसून आले असून, प्राथमिक पाहणीत हा खून दुसऱ्या ठिकाणी करून मृतदेह या निर्जन भागात आणून टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.      पोलीस या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने करत असून, खुनाचे नेमके कारण काय, कुणी व का केला याबाबत विविध कोनातून तपास सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनीही मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिल्याचे समजते.    दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. हा खून कोणत्या कारणावरून झाला, याबाबतचे धागेदोर...

जालना जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान यलो अलर्ट; विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचा तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून खबरदारीचे उपाय योजावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी :   हे करावे    विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास अनावश्यक प्रवास टाळावा. मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. जर सुरक्षित जागा उपलब्ध नसेल तर सखल जागा निवडून गुडघ्यात डोके घालून बसावे. घरात किंवा सुरक्षित जागेत थांबावे. बाल्कनी, छत, ओटा यांवर थांबू नये. घरात असताना विद्युत उपकरणे बंद करावीत. विजेचे खांब, लोखंडी वस्तू आणि तारांचे कुंपण यापासून दूर रहावे. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर यावे. हे करू नये  विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर करू नये. शॉवरखाली आंघोळ क...

वाळू माफियांचा कर्दनकाळ पुलकित सिंह यांची बदली; जनतेत नाराजी, वाळूमाफियांत आनंद ! महसूल व पोलीस विभागाची डोळेझाक

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     अंबडचे उपविभागीय अधिकारी (एसडीएम) तथा सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून बदली झाल्याची शासकीय घोषणा होताच अंबड व घनसावंगी तालुक्यातील जनतेत तीव्र नाराजी पसरली असून, दुसरीकडे वाळू माफियांमध्ये मात्र जल्लोषाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पुलकित सिंह यांच्या धाडसी कारवायांमुळे बेकायदेशीर वाळू उपसावर लगाम बसला होता. परंतु त्यांच्या बदलीनंतर अवैध वाळू वाहतूक पुन्हा दिवसाढवळ्या सुरू झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. बदलीनंतर माफियांना "सुट"- शासकीय ऑर्डर मिरवताय माफिया!      पुलकित सिंह यांच्या बदलीची शासकीय ऑर्डर काही वाळू माफियांनी थेट खिशात ठेवून मिरवल्याचे प्रकार स्थानिक पातळीवरून समोर आले आहेत. हेच चित्र त्यांचे कार्यकाळ किती त्रासदायक ठरले होते याची साक्ष देत आहे. बदलीनंतर २५ एप्रिल रोजी सकाळीच घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी रोडवरून वाळूने भरलेले हायवा वाहने सर्रास फिरताना आढळली. २१ एप्रिलची थरारक कारवाई शेवटची       २१ एप्रिलच्या मध्यरा...

स्थानिक प्रशासनाला न कळवता वरिष्ठ अधिकाऱ्यांची पिकअपने गोदापात्रात धडक- अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई

Image
  सहा ट्रॅक्टर आणि एक दुचाकी जप्त, चौघांवर गुन्हा दाखल, १० जण अद्याप अज्ञात गुप्त माहितीवर आधारित धडाकेबाज कारवाई ! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भादली येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई २१ एप्रिलच्या मध्यरात्री २.१५ वाजता अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग, प्रभारी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल आणि तहसीलदार योगिता खटावकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.     कारवाई दरम्यान गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेले सहा ट्रॅक्टर आणि MH-21-BS-143 क्रमांकाची बजाज पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली. सदर वाहने तात्काळ जप्त करून घनसावंगी तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत.     महसूल विभागाच्या तक्रारीनुसार घटनास्थळी चार व्यक्तींची ओळख पटली त्यांची नावे पुढीलप्रमाणे विष्णू भाऊसाहेब कटुले (रा. कुंभार पिपळगाव), मोहन राजाभाऊ सोळंके (रा. ...

घनसावंगी-दोन दुचाकीचा भीषण अपघात ! समोर समोर झाली धडक

Image
  तिघेजण गंभीर जखमी, जालन्यात हलवले उपचारासाठी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        २२ एप्रिल मंगळवार रोजी घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते गोंदी रस्त्यावर दोन मोटारसायकलस्वारांचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने तीर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.     MH-21-BE-2310 व MH-44-AF-1005 या दोन दुचाकीचा अपघात झाला या अपघातात आबासाहेब सखाराम कुंडकर (वय 50, रा. माजलगाव) हे अतिशय गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर मार बसला असून पायाला फ्रॅक्चर आहे. ते जोग्लादेवी येथून लग्न लावून तीर्थपुरीकडे जात होते. त्यांच्यासोबत असलेल्या सरस्वती आबासाहेब कुंडकर यांच्याही बोटांना गंभीर इजा झाली असून बोटे तुटली आहेत.      दुसऱ्या दुचाकीवरील संतोष रायभान पाटेकर (वय 40, रा. रामसगाव) हे देखील अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे. ते तीर्थपुरीहून रामसगावकडे जात होते.    सर्व जखमींना तीर्थपुरी प्राथमिक आर...

घनसावंगी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. घनसावंगी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडत आज २२ एप्रिल रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबड पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार योगिता खटावकर यांच्या उपस्थितीत पार पडली असून त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण दिलेले आहे. काही ठिकाणी चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित ग्रामपंचायती    राहेरा, कोठी, रवना, देवडी हादगाव, लिंबी, निपाणी पिंपळगाव, पानेवाडी (महिला), मरमा खुर्द (महिला), सिध्देश्वर पिंपळगाव (महिला), पिंपरखेड बु. (महिला), पाडुळी बु. (महिला), चित्रवडगाव (महिला), दहिगव्हाण बु. (महिला) अनुसूचित जमातीसाठी आरक्षण अंतरवाली राठी, मुद्रेगाव (महिला - चिठ्ठीद्वारे) नवबौद्ध व मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) या प्रवर्गातील आरक्षण चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आले असून खालील ग्रामपंचायतींमध्ये ल...

अबबब ! चक्क ऊसाला सात हजार पाचशे रुपये विक्रमी भाव

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना थंड पेयांप्रती जनतेचा ओढा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. विशेषतः ऊसाचा ताजा रस पिण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील रसवंती गृहे आणि ज्यूस सेंटरमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ऊसाला तब्बल ७५०० रुपये प्रती टन इतका विक्रमी भाव मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.    गेल्या काही दिवसांपासून शीतपेयांच्या मागणीने झपाट्याने वाढ केली असून रस तयार करण्यासाठी लागणाऱ्या ऊसाला मोठी मागणी आहे. रसवंती चालक पांडुरंग मिंधर यांनी सांगितले की, "सध्या जागेवर ऊस ७५०० रुपये टन दराने खरेदी करावा लागत आहे. यासोबतच वाहतूक खर्च सुमारे १५०० रुपये प्रती टन धरल्यास एकूण खर्च ८५०० रुपये टन इतका होतो आहे."    यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासूनच तापमानाने चढ चढाव घेतला आहे. त्यामुळे पारंपरिक चहा किंवा कॉफीऐवजी थंड आणि आरोग्यदायी पेयांची निवड करण्याकडे जनतेचा कल वाढला आहे. विद्यार्थी, पालक, मजूर वर्ग आणि इतर सर्वसामान्य नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी ऊसाच्या रसाला प्राधान्य देत आहेत...