घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सेल्फ सर्वेक्षणासाठी मुदतवाढ

नागरिकांनी १५ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावा सर्वेक्षण


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत सुरू असलेल्या 'आवास+ 2024' घरगुती सर्वेक्षणासाठी मुदत वाढविली आहे. याअंतर्गत सर्व पात्र ग्रामीण कुटुंबांची ओळख पटवण्यासाठी सेल्फ सर्वेक्षणाची अंतिम तारीख आता १५ मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

     मंत्रालयाने याआधी २८ मार्च २०२५ रोजी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, राज्यांकडून आलेल्या विनंत्यांचा विचार करून ग्रामीण विकास विभागाने आणखी १५ दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे.

   सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे की, या वाढीव मुदतीदरम्यान सर्व पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करावे. यासाठी 'आवास+ 2024' मोबाईल अॅप्लिकेशन चा वापर करून स्वयं-सर्वेक्षण प्रक्रिया राबवावी आणि त्याची योग्य ती पडताळणी करावी.

     ग्रामीण विकास विभागाचे संचालक शक्तीकांत सिंह यांनी सांगितले की, "राज्य सरकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या राज्यातील सर्व पात्र ग्रामीण कुटुंबांना या योजनेत समाविष्ट करावे आणि सेल्फ सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांची नोंदणी सुनिश्चित करावी."

    ही माहिती मंत्रालयाच्या सचिव (ग्रामीण विकास), उपमहासंचालक (ग्रामीण गृहनिर्माण), सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे नोडल अधिकारी, तसेच डीओआरडीच्या एनआयसी युनिटला देखील कळवण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपला सेल्फ सर्वेक्षण १५ मे २०२५ च्या आत पूर्ण करून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभासाठी पात्रता निश्चित करावी.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या