अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना शहरातील तरुणाचा खून ! जामवाडी शिवारात पेट्रोल पंपाजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण


    जालना तालुक्यातील जामवाडी शिवारात देऊळगाव राजा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कन्हैयानगर भागातील बंटी नारायण राजवे (वय ३०) असे करण्यात आली आहे.

    या घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. मृतदेहाच्या डोक्यावर व अंगावर गंभीर मारहाणीच्या खुणा व रक्ताचे डाग दिसून आले असून, प्राथमिक पाहणीत हा खून दुसऱ्या ठिकाणी करून मृतदेह या निर्जन भागात आणून टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

     पोलीस या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने करत असून, खुनाचे नेमके कारण काय, कुणी व का केला याबाबत विविध कोनातून तपास सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनीही मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिल्याचे समजते.

   दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. हा खून कोणत्या कारणावरून झाला, याबाबतचे धागेदोरे लवकरच मिळतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या