अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

लेका पाठोपाठ आईने विष प्राशन करून संपवले जीवन; दुहेरी शोकांतिका



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  आपल्या मुलाने फाशी घेऊन जीवन संपवले ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मनाला लाऊन घेऊन त्याच्या आईनेही काही तासातच आपले जीवन संपवल्याची खूपच दुर्दैवी घटना समोर आलीय.

   बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला या छोट्याशा गावात हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईनेही दुःखाचा भार सहन न होऊन आपले जीवन संपवले. ही दुहेरी आत्महत्या गावासाठी मोठा आघात ठरली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.


अभिमान खेत्रे याने फाशी घेऊन संपवले जीवन

   अभिमान भागुजी खेत्रे (वय ३५) या तरुणाने दिनांक २८ एप्रिल रोजी दुपारी घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच घरातील सदस्य आणि गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.


मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न होऊन आईने घेतला टोकाचा निर्णय

   अभिमानच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या आई, कौशल्या भागुजी खेत्रे (वय ७०) या पूर्णतः कोसळल्या. लाडक्या मुलाच्या निधनाने त्या मानसिक तणावात आल्या आणि काही तासांतच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान २९ एप्रिल रोजी सकाळी त्यांचं निधन झालं.


गावात हळहळ, नातेवाईकांमध्ये शोक

     एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू गावासाठी मोठा धक्का ठरला आहे. अभिमान आणि त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, नातेवाईक आणि शेजारी शोकसागरात बुडाले आहेत. “अशा पद्धतीनं आई आणि मुलाचा अंत होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं,” असे भावना व्यक्त करत एक गावकरी बोलून गेला.


पोलिस तपास सुरू

    या दुहेरी आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून, मृतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. या घटनेने केवळ वाहेगाव आमला नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे.


मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज

   या दुर्दैवी घटनेमुळे मानसिक तणाव, दु:ख आणि त्यातून उद्भवणाऱ्या आत्महत्येच्या घटना टाळण्यासाठी मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. समाजाने अशा घटनांकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या