अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

तीर्थपुरीत उद्या बंद; पहेलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   काश्मीरमधील पहेलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, व्यापारी महासंघ तीर्थपुरी यांच्या वतीने उद्या, दिनांक २७ एप्रिल रविवार रोजी तीर्थपुरीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज व्यापारी महासंघाने तीर्थपुरी पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.


    निवेदनात म्हटले आहे की, पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी नागरिकांवर बेछूट गोळीबार करत भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्या निषेधार्थ आणि शहीद नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तीर्थपुरीतील व्यापारी उद्या आपली दुकाने व व्यवसाय बंद ठेवून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.

   सर्व व्यापाऱ्यांना शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत. तसेच नागरिकांनी बंदच्या काळात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या