जालना - खून करणाऱ्या आरोपीस दोन तासांत अटक; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कार्यवाही
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने केवळ दोन तासांत आरोपीस अटक करून अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जलद कार्यवाही केली.
दिनांक २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास, नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे (रा. कन्हैया नगर, जालना) या इसमाचा देऊळगावराजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत, जामवाडी शिवारात अज्ञात इसमाने खून केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक जालना यांनी पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
चौकशीतून उघड झाले की, मयत नरेश उर्फ बंटी याने आरोपीस दारू पाजण्याचा आग्रह केला होता. त्यातून वाद होऊन मयताने आरोपीच्या आईबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे संतप्त होऊन आरोपी संदीपने लोखंडी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून नरेश याचा खून केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाणे, जालना येथे आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. कार्यवाहीत सहा. पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, तसेच पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोपाल गोशिक, रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खाडे, जगदीश बावणे, संभाजी तनपुरे, सुधीर वाघमारे, सतिश श्रीवास, देविदास भोजणे, आक्रूर धांडगे, कैलास चेके, सोपान क्षिरसागर, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, गणपत पवार, सागर बाविस्कर व दत्ता वाघुंडे यांचा सहभाग होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद आणि अचूक कार्यवाहीमुळे परिसरात पोलीस प्रशासनाबद्दल जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे
Comments
Post a Comment