अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना - खून करणाऱ्या आरोपीस दोन तासांत अटक; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कार्यवाही

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने केवळ दोन तासांत आरोपीस अटक करून अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जलद कार्यवाही केली.

   दिनांक २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास, नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे (रा. कन्हैया नगर, जालना) या इसमाचा देऊळगावराजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत, जामवाडी शिवारात अज्ञात इसमाने खून केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक जालना यांनी पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.



    पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला असता, आरोपी संदीप ज्ञानेश्वर राऊत (रा. कन्हैया नगर, जालना) हा जामवाडी येथे असल्याचे समजले. त्वरित कारवाई करत पोलीस पथकाने आरोपीस ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

    चौकशीतून उघड झाले की, मयत नरेश उर्फ बंटी याने आरोपीस दारू पाजण्याचा आग्रह केला होता. त्यातून वाद होऊन मयताने आरोपीच्या आईबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे संतप्त होऊन आरोपी संदीपने लोखंडी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून नरेश याचा खून केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाणे, जालना येथे आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   ही यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. कार्यवाहीत सहा. पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, तसेच पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोपाल गोशिक, रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खाडे, जगदीश बावणे, संभाजी तनपुरे, सुधीर वाघमारे, सतिश श्रीवास, देविदास भोजणे, आक्रूर धांडगे, कैलास चेके, सोपान क्षिरसागर, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, गणपत पवार, सागर बाविस्कर व दत्ता वाघुंडे यांचा सहभाग होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद आणि अचूक कार्यवाहीमुळे परिसरात पोलीस प्रशासनाबद्दल जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे 


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या