घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिक नुकसानीच्या मदतीसाठी आता कृषी विभागाच्या ‘अॅग्रिस्टॅक’ योजनेत नोंदणी करून मिळालेला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २९ एप्रिल २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे.
या नव्या प्रक्रियेनुसार, १५ जुलै २०२५ पासून मदत व पुनर्वसन विभागाच्या नैसर्गिक आपत्ती मदत योजनेतून शेतीपिक व शेतजमिन नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा 'फार्मर आयडी' असणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने अॅग्रिस्टॅक योजनेत आपली नोंदणी करून आपला आयडी मिळवणे आवश्यक ठरणार आहे.
शेतीपिक नुकसान पंचनामे करताना आता शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी (फार्मर आयडी) स्वतंत्र रकाना ठेवण्यात येणार आहे. पंचनामे पारंपरिक पद्धतीने केले जात असले तरी, या नव्या रकान्यात संबंधित शेतकऱ्याचा आयडी क्रमांक भरावा लागेल.
शेतीपिक नुकसानभरपाई थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीत देताना देखील शेतकऱ्याचा ‘फार्मर आयडी’ क्रमांक अनिवार्य असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या शेतकरी ओळख क्रमांकाचा अचूक वापर करावा लागणार आहे.
राज्यभर टप्प्याटप्प्याने ई-पंचनामे सुरू करताना देखील शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य राहणार आहे. यामुळे नोंदणी व मदत वाटप प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व अचूकता येईल, अशी अपेक्षा आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत अंमलात आणण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांची अचूक माहिती एकत्र करणे, विविध योजनांचा लाभ थेट व लवकर पोहोचवणे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदत वितरणाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे.
शासनाचार हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून सह सचिव कैलास गायकवाड जारी केला आहे.
Comments
Post a Comment