बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने माजवले थैमान

शेतकऱ्यांचे नुकसान वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण ३१ मार्च, सोमवार रोजी दुपार ते सायंकाळी बीड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये जोरदार पाऊस झाला, तर घनसावंगी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली. काही भागांत जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या. धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी व घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील तीर्थपुरी, खापरदेव हिवरा येथे जोरदार पाऊस झाला, तर शिंदे वडगाव येथे रिमझिम पावसाची नोंद झाली. एकलहेरा, पिठोरी सिरसगाव, आंतरवाली टेंभी, बाचेगाव, देवडी हादगाव, पाडोळी बुद्रुक येथेही पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळाला, मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड तालुक्यातील पाली, कोळवाडी, मांजरसुंबा परिसरातही अवकाळी पावसाने थैमान घातले. काह...